APMC Market : आंबा खवय्यांना पर्वणी; एपीएमसी बाजारात तब्बल सहा हजार पेट्यांची आवक

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी बाजार येथे कोकणातून येणाऱ्या आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. तब्बल सहा हजार पेट्या बाजारात दाखल झाल्याने आंबा खवय्यांसाठी ही एक पर्वणी ठरली आहे. मात्र आंब्याचे दर अजूनही वरचढ असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


मागील काही दिवसांपासून कोकणातून येणाऱ्या आंब्याची आवक वाढू लागली असून आज नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात तब्बल सहा हजार पेट्यांची आवक झाली आहे. चालू हंगामातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवक असल्याचे सांगितले जात आहे.


मात्र वातावरणातील सतत होणारे बदल, धुके आणि तापमानातील चढउतार यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा खराब होऊन कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.


सध्या बाजारात एका पेटीचा दर सुमारे चार हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत आहे. पुढील काही दिवसांत आंब्याची आवक वाढण्याची शक्यता असली तरी दर मात्र वरचढ राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, कोकणातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता आंबा खवय्यांनी थोडीशी खिशाला कात्री देत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहनही आंबा व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर

एलपीजी पुरवठा सुरक्षित; काळाबाजार करणाऱ्यांवर राज्य सरकारचा 'सर्जिकल स्ट्राईक'

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : मध्य-पूर्व आशियातील युद्धजन्य

मुंबई अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’

- उपग्रह छायाचित्रांद्वारे अतिक्रमणे शोधणार; म्हाडा, एसआरए आणि वन विभागाला दिले निर्देश मुंबई : मुंबईतील मोकळ्या

Freedom of Religion Bill : धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे कोणत्याही धर्मावर अन्याय नाही

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मतांच्या लांगुलचालनासाठी विरोधकांकडून कायद्याला विरोध मुंबई : "धर्मस्वातंत्र्य

पागडी इमारतींमधील रहिवाशांच्या प्रश्नी सरकार सकारात्मक; राज्यमंत्री पंकज भोयर यांचे विधान परिषदेत ठोस उपाययोजनेचे आश्वासन

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक ओळख असलेल्या आणि सुमारे १०० वर्षांहून जुन्या १३ हजार पागडी व सेस इमारतींमध्ये