युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे ऊर्जा क्षेत्रावर परिणाम झाला असून त्याचा अप्रत्यक्ष फटका भारतालाही बसत असल्याचे चित्र दिसत आहे. काही भागात एलपीजी गॅसचा पुरवठा कमी झाल्याने नागरिकांना पर्यायी उपाय शोधावे लागत आहेत.


महाराष्ट्रातील काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेकांनी स्वयंपाकासाठी इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या यांचा वापर सुरू केला आहे. मात्र हॉटेल व्यवसायिकांसह मोठ्या प्रमाणात इंधन लागणाऱ्या ठिकाणी सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने काहींनी पुन्हा पारंपारिक चुलीकडे वळण्याचा मार्ग स्वीकारला आहे.


गॅस उपलब्ध नसल्यामुळे स्वयंपाकासाठी गायी आणि म्हशीच्या शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्यांची मागणी वाढली आहे. चूल पेटवण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी या गोवऱ्यांचा वापर केला जात असल्याने स्थानिक बाजारात त्यांची विक्री वाढली आहे.


लाकडाचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. त्यामुळे चूल पेटवणे सोपे जावे आणि धूर कमी व्हावा यासाठी नागरिक शेणाच्या गोवऱ्यांचा पर्याय निवडत आहेत. सुरुवातीला अत्यल्प किमतीत मिळणाऱ्या या गोवऱ्यांना युद्धाच्या निमित्ताने बाजारात चांगला भाव मिळू लागला आहे.


दररोज मजुरांच्या मदतीने सुमारे ६००ते ७०० गोवऱ्या तयार केल्या जात असून त्यापैकी मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. घरगुती वापरासोबतच हॉटेल व्यवसायिकांकडूनही मागणी वाढल्याने अनेकजण एक दिवस आधीच बुकिंग करून गोवऱ्या घेत आहेत . सध्या एका गोवऱ्याची किंमत सुमारे ७ ते १० रुपयांपर्यंत पोहोचली असून गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर या पारंपारिक इंधनाला पुन्हा मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे.

Comments
Add Comment

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार; कामशेतमध्ये दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये.....

पुणे : पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात दुकानांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी