कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम अभिनेता फरमान खानशी लग्न करून तिने सगळ्यांना धक्का दिला. अनेकजण या लग्नाला लव्ह जिहाद म्हणत आहेत. पण या कपलने आपण एकमेकांवर प्रेम करत असून लव्ह जिहाद नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान आता मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी मोनालिसासोबत नको तेच घडल्याचा आरोप केला आहे.


मोनालिसा आणि फरमान यांनी केरळच्या एका मंदिरात लग्न केलं आहे. आपण एकमेकांवर प्रेम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. फरमानने मोनालिसानेच आपल्याला प्रपोज केलं, असं सांगितलं. तसंच मोनालिसाचं कुटुंब तिचं लग्न गावातील दुसऱ्या पुरुषासोबत लावून देत होते, त्यामुळे त्यांनी लग्न केल्याचं ते म्हणाले. पण मोनालिसाच्या वडिलांनी मात्र आपल्या मुलीला फसवलं, तिच्यासोबत काहीतरी केलं असा आरोप केला आहे. मोनालिसाच्या वडिलांनी सांगितल्यानुसार तेसुद्धा मोनालिसासोबत केरळमध्येच होते. नेमकं काय काय घडलं ते सगळं त्यांनी सांगितलं आहे.


जयसिंग म्हणाले, "मोनालिसा आणि मला एक महिन्यापासून फोन येत होता. आम्हाला एक्टिंग शिकवतील आणि एक गाणंही तयार करतील असं आम्हाला सांगण्यात आलं. म्हणून तिथं काय कसं आहे हे पाहण्यासाठी मी आणि मोनालिसा केरळला गेलो. तिथं एक्टिंग चांगली शिकवतात, कथ्थकही कमी किमतीत शिकवतात हे आम्हाला कळलं. म्हणून तिथं दोन दिवस राहून काय होतं पाहुयात असं ठरवलं. आता अभिनय शिकण्यासाठी तिथं राहायचं म्हणजे घर हवं, त्याबाबत मी विचारलं, तर ते देण्याचीही त्यांनी तयारी दाखवली"



माझ्या मुलीला फसवलं, माझ्या डोळ्यासमोर त्यांनी तिला...



"आम्हाला तिथं ४-५ दिवस झाले. त्यावेळी मला घरून माझी आई बोलावत असल्याचे फोन येते होते. म्हणून मी त्यांना मला घरी जाण्याच्या तिकिटाची व्यवस्था करून द्यायला सांगितलं. आम्ही एअरपोर्टकडे जायला निघालो तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला गाडी थांबवली आणि मोनालिसाला पोलीस स्टेशनला नेलं. पण त्यांनी मला आत येऊ दिलं नाही. कित्येक तास बाहेर ठेवलं", असं त्यांनी सांगितलं.


मोनालिसाच्या वडिलांनी याचं कारणही त्यांना विचारलं. जयसिंह म्हणाले, "त्यांना याचं कारण विचारलं तेव्हा ते तुम्ही मोनालिसाचं जबरदस्ती लग्न लावत आहात, तिला तुमच्यासोबत यायचं नाही असं सांगितलं. मोनालिसानेही मला तिथून जायला सांगितलं. इथेच राहून अभिनय, नृत्य आणि चित्रपट शिकेन असं ती म्हणाली. मला दोन मिनिटंही न सोडणारी माझी मुलगी. मला वाटतं माझ्या मुलीला फसवलं आहे किंवा तिच्यासोबत काहीतरी केलं आहे. हा जादूटोणा असू शकतो. त्यांनी माझ्या डोळ्यासमोर मोनालिसाला पळवून नेलं. असं काय झालं की त्यांनी मला तिथून पळवून लावलं आणि माझ्या मुलीला घेऊन गेले?"



'मला आयुष्य संपवावं वाटलं'



"मुस्लिम मुलाशी लग्न करणं चुकीचं आहे. मला आयुष्य संपवावं असं वाटत होतं. पण माझा मुलगा म्हणाला, 'बाबा माझ्यासाठी जगा'. पण आता मोनालिसासारख्या मुलीचं मी काय करावं?", असा प्रश्न त्यांना पडला आहे.


"मला माझ्या मुलीला एकटं सोडायचं नव्हतं. मी माझ्या मुलीसाठी खूप मेहनत घेतली. मला खूप वाईट वाटतंय. मोनालिसाने सांगितलं की ती अभिनय शिकून परत येईल. ती कधी परत येते, मी तिची वाट पाहत आहे. पण लग्न पाहून असं वाटत नाही की ती येईल", अशी खंत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

Comments
Add Comment

Mathura Accident : मथुरेत भीषण दुर्घटना! भाकिकांनी भरलेली बोट यमुनेत बोट बुडाली; ९ भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील मथुरा (Mathura) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीमध्ये

Whatsapp Privacy : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीवर मोठा वाद; एलोन मस्क आणि टेलिग्रामचे सीईओकडून प्रश्न उपस्थित

मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ

Justice Yashwant Verma : जस्टिस यशवंत वर्मांनी दिला राजीनामा, घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा

West Bengal : पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे ‘भरोसा पत्र’ जाहीर

भाजपकडून “सोनार बांग्ला” घडवण्याचा व्यक्त केला निर्धार कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला अवघे 13 दिवस

Chhattisgarh Accident : छत्तीसगड हादरलं! लग्नावरून परतताना भीषण अपघात; ६ ठार, ३ गंभीर जखमी

छत्तीसगडमधील कांकेर (Chhattisgarh Accident) जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (९ एप्रिल) उशिरा रात्री

Share Market Update : जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत; आशियाई बाजारही तेजीत

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांतता चर्चा पुन्हा मार्गी लागल्याच्या बातमीने बाजारातील वातावरण सुधारत असल्याचे