रस्त्यालगतच्या चायनीज गाड्या हटवणार; मंत्री नरहरी झिरवळ यांचे आश्वासन

मुंबई: मुंबई-पुण्यासह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये रस्त्यांच्या कडेला उघड्यावर चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या गाड्यांची दोन दिवसांत तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी गुरूवारी विधानसभेत दिले. तसेच, भेसळखोरांवर कठोर कारवाईची तरतूद असलेल्या प्रस्तावित कायद्याचे प्रारूप अंतिम मंजुरीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.


आमदार सुनील कांबळे यांनी पुणे शहरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सिद्धार्थ शिरोळे, विकास ठाकरे, योगेश सागर, मनीषा चौधरी आणि सुरेश धस यांनी हॉटेलमधील निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत प्रश्न केले. तसेच, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी मनुष्यबळ आणि योग्य यंत्रणा नसल्याचा मुद्दा मांडला.


त्यावर उत्तर देताना झिरवळ म्हणाले की, ‘प्रशासनाकडून १९७ नवीन अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात तपासणी मोहिमेला गती येईल. तसेच, प्रत्येक विभागात प्रयोगशाळा सुरू करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यापैकी पुणे आणि नाशिक येथील प्रयोगशाळा अंतिम टप्प्यात असून लवकरच त्या पूर्ण क्षमतेने सुरू केल्या जातील. तसेच, खासगी प्रयोगशाळांच्या सेवाही घेतल्या जातील.


दरम्यान, नागरिकांनी अन्न व औषधांसंदर्भात तक्रारीसाठी १८००-२२२-३६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र, ‘या नंबरवर फोन करून काहीच होत नाही,’ असे म्हणत आमदार योगेश सागर यांनी या व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

चिंता करू नका; भारतात गॅस-इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध - मंत्री हरदीप सिंह पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस

सनरायजर्स लीड्सच्या काव्या मारनने पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात घेतल्याने समाज माध्यमावर संताप

मुंबई: काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं द हंड्रेड २०२६ च्या ऑक्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेट

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

US embassy in pakistan : अमेरिका कायमचा बंद करणार पाकिस्तानातील आपला वाणिज्य दूतावास

- दरवर्षी होणार तब्बल ७.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बचत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे की

ऐतिहासिक 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक' आज विधानसभेत!

प्रलोभने, सक्तीच्या धर्मांतराला बसणार चाप; महायुती सरकारचे निर्णायक पाऊल मुंबई : राज्यात गेल्या काही काळापासून