केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन'च्या निमित्ताने आयोजित 'सीईओ राऊंडटेबल' येथे उपस्थिती दर्शविली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केमिकल इंडस्ट्रीचे भविष्य व विकासाची नवी दिशा स्पष्ट केली.


सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशाचे केंद्र असल्याचे नमूद करत या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा व प्लग-अँड-प्ले सुविधा निर्माण करण्यास महाराष्ट्र शासन प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच, उद्योगांसाठी पर्यावरणाशी संबंधित परवानग्या आता अधिक पारदर्शक आणि वेगवान झाल्या असल्याचे अधोरेखित केले.


शिक्षण आणि उद्योग यांच्यातील समन्वयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष भर दिला. यासह उद्योगांना आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आयटीआय (ITI) आणि इतर नामांकित शिक्षण संस्थांसोबत भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, केमिकल इंडस्ट्रीसाठी एक स्वतंत्र आणि सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्रातील उद्योजकांना निमंत्रित केले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यापूर्वी दरवर्षी वीज दरात ९ टक्के वाढ होत असे, मात्र आता नवीन नियमांनुसार पुढील पाच वर्षांत वीज दरात कोणतीही वाढ होणार नाही, उलट त्यात दरवर्षी १.२ टक्केकपात होऊन एकूण ९ टक्के कपात होईल. यावेळी केमिकल इंडस्ट्रीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या

दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला संभ्रम दूर

मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे