विधानभवनात बॉम्ब ठेवल्याचा ई मेल आला आणि पोलिसांची धावपळ झाली

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे. कामकाज सुरळीत सुरू आहे. अर्थसंकल्पही सादर करून झाला आहे. इतर कामकाज सुरू असताना गुरुवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने विधानभवनात बॉम्ब ठेवल्याचा ई मेल पाठवला. हा ई मेल मिळताच पोलिसांची धावपळ झाली.


खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी विधानभवनातून अधिकारी आणि कर्मचारी यांना बाहेर काढून तातडीने तपासणी केली. तपासणी दरम्यान निव्वळ दहशत पसरवणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे या हेतूने ई मेल केल्याचे लक्षात आले. यानंतर विधानभवनात कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली. पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने धमकीचा ई मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. संबंधित व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


खलिस्तान समर्थक अज्ञाताने दिलेली धमकी


खलिस्तान समर्थक अज्ञाताने मुंबईचे विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल मुंबई पोलीस आयुक्तालयाला पाठवला. यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांना मोकळ्या जागेत थांबवून विधानभवनात तपासणी करण्यात आली. इमारतीत बॉम्ब नसल्याची खात्री झाल्यानंतर कामकाज सुरू करण्यात आले. धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

Comments
Add Comment

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

स्थापना दिनानिमित्त ५१ लाख घरांवर फडकणार भाजपचा झेंडा

मुंबई : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त दि. ५ ते १२ एप्रिल याकाळात रोजी राज्यभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन होणार असून,

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन