मुंबईतील आग विझवण्यासाठी १०४ मीटरची शिडी आणणार

मंत्री उदय सामंत; टोलेजंग इमारतींची संख्या वाढत असल्याने निर्णय


मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारतींची वाढती संख्या लक्षात घेता, शहराची अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात १०४ मीटर उंचीची अत्याधुनिक शिडी दाखल होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.


नियम ९२ अन्वये आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना सामंत बोलत होते. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर असून येथील वाढत्या नागरीकरणाच्या गरजा ओळखून अग्निशमन यंत्रणा अधिक प्रगत करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मुंबई अग्निशमन दलाकडे सध्या ९४ मीटर उंचीपर्यंतची शिडी उपलब्ध आहे. मात्र, चेन्नईमध्ये सध्या देशातील सर्वाधिक उंच १०४ मीटरची शिडी वापरात आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबईसाठी त्यापेक्षाही अधिक प्रगत तंत्रज्ञानाची शिडी उपलब्ध करून देण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.


उंच इमारतींच्या सुरक्षेबाबत बोलताना सामंत म्हणाले की, "उंच इमारतींमध्ये आता आधुनिक अग्निसुरक्षा प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. यामध्ये फायर स्टेअरकेस, फायर लिफ्ट, स्प्रिंकलर प्रणाली, अलार्म व्यवस्था आणि फायर एस्केप यांसारख्या सुविधांचा समावेश असतो. या सर्व उपाययोजनांची पूर्तता झाल्याची खात्री पटल्यानंतरच महानगरपालिका आणि अग्निशमन दलातर्फे इमारतींना अंतिम परवानगी दिली जाते." आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्यास सरकारचे प्राधान्य असून, भविष्यात अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने ही यंत्रणा अधिक बळकट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

मुंबई: राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे

Goregaon News : गोरेगावात शोभायात्रेदरम्यान दोन गट भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज, ८ जणांना अटक

मुंबई : काल गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये अचानक उसळलेल्या वादाने हिंसक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील