खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा तिढा सुटणार

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव मळा आणि परिसरातील सुमारे ६ हजार ५७६ एकर जमिनीबाबत खंडकरी शेतकऱ्यांना न्याय देण्यासोबतच त्या ठिकाणी शेतीपूरक उद्योग उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. या जमिनीचा विनियोग कसा करावा, याबाबत 'मंत्रिमंडळ उपसमिती' सखोल अभ्यास करून निर्णय घेईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिले. या प्रक्रियेत कोणताही घोटाळा होऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी सभागृहाला आश्वस्त केले.


आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आणि नानाभाऊ पटोले व विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या हरकतींवर उत्तर देताना महसूलमंत्री बोलत होते. महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, या जमिनी खंडकरी शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यासाठी स्वतंत्र कायदा करणे आवश्यक आहे. सरकारने तयार केलेला हा कायदा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला असता, त्यांनी यावर राष्ट्रपतींचे मत घेण्याचे निर्देश दिले आहेत. "संपादित केलेली जमीन पुन्हा मूळ मालकाला देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल आडवे येत असल्याने हा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे,"


शेतकऱ्यांना जमीन की एमआयडीसीचा प्रकल्प?


सध्या सरकारसमोर दोन पर्याय असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले. खंडकरी शेतकऱ्यांना जमीन परत करण्यासाठी नवीन कायदा करून राष्ट्रपतींची मंजुरी मिळवणे आणि या जमिनीवर सौर ऊर्जा किंवा विमानाचे इंधन तयार करण्याचा प्रकल्प उभारणे. यामध्ये नेपिअर ग्रास (चारा) पासून हायड्रोजन निर्मिती करण्याचा प्रस्ताव असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला मोठा भाव मिळू शकतो.

विरोधकांच्या आरोपांना महसूलमंत्र्यांचे उत्तर


आमदार विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी ही जमीन खाजगी कंपन्यांच्या घशात घातली जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री म्हणाले की, "एमआयडीसीला ही जमीन देताना ती 'रेडी रेकनर'च्या चालू बाजारभावाने दिली जाईल. त्यामुळे शेती महामंडळाचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. तसेच, जर हा प्रकल्प शेती महामंडळ स्वतःच्या स्तरावर तांत्रिकदृष्ट्या राबवू शकत असेल, तर त्या पर्यायाचाही विचार उपसमिती करेल."

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम