Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी (रा. संजयनगर, श्रीरामपूर) याच्याविरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही घरकाम करून उदरनिर्वाह करत असून, तिचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. वैवाहिक आयुष्यातील वाद आणि अत्याचारामुळे ती माहेरी राहत असताना आरोपी अक्षय गवळी याच्याशी तिची ओळख झाली. सुरुवातीला फोनवरून संपर्क साधत आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत २०२२ पासून वेळोवेळी तिच्याशी जबरदस्तीने तसेच फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवले. पुढे पीडितेला घटस्फोट घेण्यास प्रवृत्त करून शिरसगाव येथे भाड्याच्या खोलीत पती-पत्नीप्रमाणे राहूनही आरोपीने तिचे शोषण सुरूच ठेवले.


दरम्यान, मार्च २०२६ मध्ये आरोपी दुसऱ्या मुलीशी विवाह करत असल्याचे समजताच पीडित तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान आरोपीने दुसरे लग्न केल्याचेही उघड झाले. त्यानंतरही आरोपीने पीडितेला मारहाण करून घराबाहेर काढल्याची तक्रार आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६४(2)(m) अन्वये गुन्हा रजि नं. २३६/२०२६ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे हे करत आहे.

Comments
Add Comment

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना