चंद्रपुरात कोळसा प्रदूषणाला बसणार चाप; विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाईंकडून 'चंद्रपूर मॉडेल'ची घोषणा!

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण आणि वाहतुकीच्या समस्यांबाबत राज्य सरकार अत्यंत गंभीर असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 'चंद्रपूर मॉडेल' तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत केली. आमदार उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती सभागृहाला दिली.


राजुरा परिसरातील गोवरी, सास्ती, धोपटाळा आणि पोवनी यांसारख्या खाण पट्ट्यात कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासाची दखल घेत प्रशासनाने आतापर्यंत नियम मोडणाऱ्या ३५५ वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई केली आहे. ट्रकवर ताडपत्री न झाकणे आणि अनधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत कडक तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला दोषी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले असून, नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता असल्याचे मंत्री देसाई यांनी नमूद केले.


या चर्चेत सहभागी होताना आमदार प्रवीण दरेकर यांनी विविध विभागांमधील समन्वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री शंभूराजे देसाई यांनी जाहीर केले की, केवळ पाणी फवारणे किंवा झाडे लावणे एवढ्यावरच न थांबता पोलीस, परिवहन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महसूल विभाग यांचा समावेश असलेली एक 'उच्चस्तरीय समन्वय समिती' स्थापन केली जाईल. या समितीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात एक पथदर्शी 'मॉडेल प्लॅन' राबवला जाईल. अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्याच्या आत ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल आणि तिचे यश पाहून हाच पॅटर्न संपूर्ण राज्यात जिथे खनिजांचे उत्खनन चालते, तिथे लागू केला जाईल.


कोळसा वाहतुकीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अवैध कामांना चाप लावण्यासाठी सरकारने आता 'जीपीएस' (GPS) प्रणाली अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, कोळसा डेपोमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहनाचे 'रिअल-टाइम' लोकेशन ट्रॅक केले जाईल, ज्यामुळे वाहन कोणत्या मार्गावरून जात आहे आणि कुठे थांबले आहे याची अचूक माहिती मिळेल. तसेच, ओव्हरलोड वाहनांची तपासणी करण्यासाठी आरटीओ आणि पोलिसांची 'भरारी पथके' (Flying Squads) वाढवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.


प्रदूषण नियंत्रणासाठी वेकोलीमार्फत खाण परिसरात नियमित पाणी फवारणी, हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 'सतत हवा गुणवत्ता केंद्र' उभारणे आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, जड वाहनांच्या वाहतुकीसाठी नवनिर्मित हायब्रिड अॅन्युईटी रस्त्यांचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. केवळ कारवाईवर अवलंबून न राहता सामाजिक कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम शासन युद्धपातळीवर करत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Comments
Add Comment

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी