अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे यांच्या क्रीडा क्षेत्रातील देदीप्यमान योगदानाचा आणि प्रशासकीय अनुभवाचा विचार करून राज्य सरकारने त्यांना पुन्हा शासन सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. खाडे यांच्या विनंतीवरून, त्यांनी यापूर्वी दिलेला राजीनामा मागे घेण्यास सरकारने 'विशेष बाब' म्हणून मंजुरी दिली असून नियुक्तीचा शासन आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला.

मूळचे कोल्हापूरचे असलेले विरधवल खाडे यांनी महसूल विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता, जो ३० सप्टेंबर २०२४ रोजी स्वीकारण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय सेवेत पुन्हा कार्यरत होण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी अर्जाद्वारे विनंती केली होती. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन सरकारने त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. खाडे यांना तहसीलदार पदावर पुनश्च रुजू करण्यात आले असून, पुढील पदस्थापनेचे आदेश मिळेपर्यंत त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण येथे उपस्थित राहून कामकाज पाहण्याचे निर्देश दिले आहेत.
Comments
Add Comment

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू

आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sri Lanka Cricket Team : विश्वचषकासाठी श्रीलंकेची जोरदार तयारी; प्रशिक्षकपदी केली 'या' महान खेळाडूची नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय