Navi Mumbai : प्रियकराने ब्लॉक केले; तरुणीची चालत्या ट्रेनमधून खाडीत उडी

नवी मुंबई:  नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरून चालत्या ट्रेनमधून एका तरुणीने पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


सुदैवाने तिच्या खांद्यावर बॅग असल्यामुळे ती पाण्यावर तरंगत राहिली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या वाशी गावातील मच्छीमार महेश सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी जीवाची बाजी लावून संबंधित तरुणीला वाचवले.


तिला सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वाशी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार ती चेंबूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.


ही घटना आज सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. कोणतेही कारण न देता आपल्या प्रियकराने ब्लॉक केल्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे संबंधित तरुणीने सांगितले आहे.


या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही

Ashwini Bhide : पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे

Mahavir Jayanti : 'जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो'

मुंबई : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान

Lokesh Chandra Additional Chief Secretary : लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या

kurla bus accident : कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातील आरोपी बस चालकाला जामीन

मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय

Maharashtra : महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते