राज्यातील प्रलंबित मुद्रांक प्रकरणांचा निपटारा जलद; 'महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक २०२६' मंजूर

मुंबई: राज्यातील मुद्रांक शुल्क विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी तसेच, प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेले 'महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक २०२६' आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले.


स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या आर्थिक अधिकारात मोठी वाढ करण्यात आल्याने मुद्रांक शुल्काशी संबंधित प्रकरणांच्या निर्णयासाठी आता नोंदणी महानिरीक्षक (IGR) स्तरावर जाण्याची गरज पडणार नाही.


सध्याच्या कायद्यातील कलम ५२ 'अ' मध्ये सुधारणा करून प्रशासकीय अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे नोंदणी महानिरीक्षकांकडे (IGR) येणारा कामाचा ताण कमी होऊन स्थानिक स्तरावरच निर्णय होतील.



सुधारित आर्थिक मर्यादा खालीलप्रमाणे


जिल्हाधिकारी (मुद्रांक) - ५ लाख रुपये वाढ करुन २० लाख रुपये.



नोंदणी उपमहानिरीक्षक (मुंबई वगळून) - २० लाख रुपये वाढ करून ५० लाख रुपये.



अप्पर मुद्रांक नियंत्रक (मुंबई) - २० लाख रुपये वाढ करुन १ कोटी रुपये.



मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी - २० लाख रुपये वाढवून १ कोटी रुपये.



सामान्यांची 'तारीख पे तारीख' थांबणार



विधेयकावर बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "सध्या अनेक केसेस केवळ आर्थिक मर्यादा कमी असल्यामुळे राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांकडे प्रलंबित राहतात. यामुळे नागरिकांना मुंबईला चकरा माराव्या लागतात आणि मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. आता जिल्हाधिकारी आणि उपमहानिरीक्षक स्तरावरच मोठ्या रकमेच्या प्रकरणांचा निकाल लावता येईल. यामुळे पारदर्शकता येईल आणि प्रलंबित कामांचा डोंगर लवकर उपसला जाईल."


हे विधेयक क्र. ९ (२०२६) विधानसभेत मांडण्यापूर्वीच विधान परिषदेनेही याला संमती दिली होती. आज विधानसभेत विधेयक खंडशः विचारात घेऊन ते बहुमताने संमत करण्यात आले. यासोबतच 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक २०२६' (विधेयक क्रमांक २) देखील सभागृहात मांडण्यात आले. या ऐतिहासिक सुधारणेमुळे महसूल विभागाच्या कामात गती येणार असून, मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारातील तांत्रिक अडचणी लवकर सुटण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; स्फोटानंतर आगीचा भडका होताच कामगार धावले

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा

मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती; मंत्री नितेश राणे यांची संकल्पना

मुंबई: आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मत्स्य व्यवसाय विभागात डिजिटल क्रांती घडवण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय आणि

Miss India Earth 2019 : आतिफशी लग्न, मग धर्म परिवर्तन, आणि पुन्हा हिंदू धर्म.... या मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली

म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला गती!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ULB) ग्रीन

Heat Wave Alert: उन्हाची तीव्रता वाढली, राज्यातील 'या' जिल्ह्यांना हीट वेव्हचा इशारा

मुंबई: उन्हाळा वेळेआधीच तीव्र होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील तापमानाने पस्तिशी

Gas Cylinder: गॅस नियमांत मोठे बदल; पुण्यातील 'या' ग्राहकांना आता मिळणार नाही गॅस सिंलिंडर

पुणे: तुम्ही जर घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आतापासून KYC (केवायसी)