अभिषेक शर्माने नॉकआउटमध्ये विक्रमी अर्धशतकासह रचला इतिहास

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्माने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील नॉकआउटच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकून आपल्या टीकाकारांना बॅटनं उत्तर दिले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यावर भारतीय संघावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आली. सूर्यकुमार यादवनं कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरत असल्याचे सांगत अभिषेक शर्मावर भरवसा कायम दाखवला. त्यानेही संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत फायनलमध्ये विक्रमी खेळी साकारली. १८ चेंडूत अर्धशतक साजरे करत त्याने नॉकआउटमधील सर्वात जलद अर्धशतक ठोकले.


याआधी फिन ॲलन याने ईडन गार्डन्सच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात १९ चेंडूत अर्धशतक ठोकून हा विक्रम केला होता. पण आता हा विक्रम अभिषेकच्या नावावर आहे, ज्याने संपूर्ण स्पर्धेत संघर्ष केल्यानंतर अंतिम फेरीसाठी आपले सर्वोत्तम अर्धशतक झळकावले. अभिषेकने यंदाच्या हंगामातील सर्वात जलद अर्धशतकही नोंदवले.


टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम हेनरिक क्लासेन यांच्या नावावर होता. त्याने २०२४ मध्ये बार्बाडोसमध्ये भारताविरुद्ध २३ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. अभिषेक शर्मासाठी ही स्पर्धा भयावह स्वप्नासारखी राहिली. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर त्याला संघाबाहेर करा, अशी मागणी झाली. पण शेवटी याच पठ्ठ्याने नॉकआउटमधील सर्वात जलद अर्धशतक झळावण्याचा पराक्रम करुन दाखवला.

Comments
Add Comment

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय

Ishan Kishan : सामन्याच्या आधी इशान किशनवर दुःखाचा डोंगर; इशानने विजयाचं श्रेय दिलं या व्यक्तीला

मुंबई : अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाने दणदणीत

जेम्स नीशमच्या ‘त्या’ षटकामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक

मुंबई (प्रतिनिधी) : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वादार फलंदाजी पाहायला

संजू सॅमसन बनला क्रिकेट विश्वाचा नवा ‘फायनल बॉस’!

कोहली-सॅम्युअल्स-विल्यमसनचे रेकॉर्ड्स धुळीस अहमदाबाद (वृत्तसंस्था) : भारतीय फलंदाज संजू सॅमसनने टी-२० विश्वचषक

Sanju Samson: संजूच्या यशामागे सचिन तेंडुलकरचा हात?; भावूक पोस्ट चर्चेत

मुंबई: भारताने टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर ९६ रनने विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरलं आहे. या