कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी, आध्यात्मिक शुद्धीसाठी आणि शारीरिक-मानसिक नियंत्रणासाठी उपवास करण्याकरिता अतिशय पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. दरवर्षी २४ वेळा एकादशी येते. विष्णूला प्रसन्न करण्यासाठी एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. महाराष्ट्रात आषाढी एकादशी (देवशयनी) आणि कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी) या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या दिवशी पंढरपूरची वारी केली जाते. इतर एकादशींना उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही 'पापमोचनी एकादशी' म्हणून ओळखली. पापातून मुक्तता मिळवण्यासाठी या एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात.


यंदा हिंदू पंचांगाप्रमाणे अर्थात हिंदू कॅलेंडरप्रमाणे रविवार १५ मार्च २०२६ रोजी 'पापमोचनी एकादशी' आहे. 'पापमोचनी एकादशी' शनिवार १४ मार्च २०२६ रोजी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि रविवार १५ मार्च २०२६ रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत रविवार १५ मार्च रोजी करायचे आहे. उपवास सोमवार १६ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेसहा ते आठ वाजून चोपन्न मिनिटे या कालावधीत सोडता येईल.


नकळत घडलेल्या चुका, मानसिक क्लेश आणि पापांच्या भारातून मुक्त होण्यासाठी पापमोचनी एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. ही एकादशी हिंदू पंचांगानुसार वर्षातली शेवटची एकादशी म्हणून ओळखली जाते. वर्षभरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत म्हत्त्वाचे मानले जाते. ब्रह्मपुराणात या एकादशीचा उल्लेख आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात. यासाठी आंघोळ करुन धूत वस्त्र अथवा सोवळे नेसून संकल्प करतात. शुद्ध तुपाचा दिवा लावून विष्णूची प्रतिमा किंवा मूर्ती याची प्रतिष्ठापना करतात. मूर्तीला पंचामृताने स्नान घालतात. नंतर विष्णूला तुळशीची पानं अर्पण करतात. विष्णूसहस्त्रनामाचा जप करतात. विष्णूच्या कथांचे वाचन करतात. उपवास करतात किंवा ताज्या फळांचे सेवन करतात. विष्णूचे नामस्मरण करतात. या व्रताला मनापासून केले तर आर्थिक, सामाजिक, मानसिक प्रगती होते असे सांगतात. अडचणींमधून मार्ग निघतो असेही सांगतात. यामुळे ज्यांची श्रद्धा आहे अशी मंडळी मनापासून हे व्रत करतात.


ही संकलित माहिती आहे. प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.

Comments
Add Comment

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

Bhoot Bangla : धुरंधर २ सिनेमामुळे अक्षयचा 'भूत बंगला' पुन्हा लांबणीवर जाणार ?

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. अक्षय कुमारचा भूत बंगला या

Tuljabhavani Temple : चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त २२ तास खुलं राहणार तुळजाभवानीचं दर्शन

तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात यंदा विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली असून चैत्र पौर्णिमा

Matka King : विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सरप्राईज, १७ एप्रिलला रिलीज होणार ‘मटका किंग’

मुंबई : अभिनेता विजय वर्माच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात लोकप्रिय प्राईम व्हिडिओनं विजयच्या आगामी

Rakesh Bedi : धुरंधर २ मधील जमील जमाली साकारण्याआधी राकेश बेदीच्या 'या' भूमिकांनी जिंकली होती प्रेक्षकांची मने

मुंबई : काहीवेळा एखाद्या अभिनेत्याला आपल्या अभिनयाची छाप पाडण्यासाठी एक दमदार अभिनय पुरेसा असतो. धुरंधर २

Vijaypat Singhania : एका सहीमुळे बदललं विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य, १२०० कोटींची संपत्ती असतानाही रहावं लागलं भाड्याच्या घरात

मुंबई : पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित, रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष आणि उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ.