कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी, आध्यात्मिक शुद्धीसाठी आणि शारीरिक-मानसिक नियंत्रणासाठी उपवास करण्याकरिता अतिशय पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. दरवर्षी २४ वेळा एकादशी येते. विष्णूला प्रसन्न करण्यासाठी एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. महाराष्ट्रात आषाढी एकादशी (देवशयनी) आणि कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी) या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या दिवशी पंढरपूरची वारी केली जाते. इतर एकादशींना उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही 'पापमोचनी एकादशी' म्हणून ओळखली. पापातून मुक्तता मिळवण्यासाठी या एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात.


यंदा हिंदू पंचांगाप्रमाणे अर्थात हिंदू कॅलेंडरप्रमाणे रविवार १५ मार्च २०२६ रोजी 'पापमोचनी एकादशी' आहे. 'पापमोचनी एकादशी' शनिवार १४ मार्च २०२६ रोजी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि रविवार १५ मार्च २०२६ रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत रविवार १५ मार्च रोजी करायचे आहे. उपवास सोमवार १६ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेसहा ते आठ वाजून चोपन्न मिनिटे या कालावधीत सोडता येईल.


नकळत घडलेल्या चुका, मानसिक क्लेश आणि पापांच्या भारातून मुक्त होण्यासाठी पापमोचनी एकादशीला उपवास आणि विष्णूचे नामस्मरण करतात. ही एकादशी हिंदू पंचांगानुसार वर्षातली शेवटची एकादशी म्हणून ओळखली जाते. वर्षभरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत म्हत्त्वाचे मानले जाते. ब्रह्मपुराणात या एकादशीचा उल्लेख आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात. यासाठी आंघोळ करुन धूत वस्त्र अथवा सोवळे नेसून संकल्प करतात. शुद्ध तुपाचा दिवा लावून विष्णूची प्रतिमा किंवा मूर्ती याची प्रतिष्ठापना करतात. मूर्तीला पंचामृताने स्नान घालतात. नंतर विष्णूला तुळशीची पानं अर्पण करतात. विष्णूसहस्त्रनामाचा जप करतात. विष्णूच्या कथांचे वाचन करतात. उपवास करतात किंवा ताज्या फळांचे सेवन करतात. विष्णूचे नामस्मरण करतात. या व्रताला मनापासून केले तर आर्थिक, सामाजिक, मानसिक प्रगती होते असे सांगतात. अडचणींमधून मार्ग निघतो असेही सांगतात. यामुळे ज्यांची श्रद्धा आहे अशी मंडळी मनापासून हे व्रत करतात.


ही संकलित माहिती आहे. प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.

Comments
Add Comment

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून

देशात पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, भारताकडे ४ हजार कोटी लिटर तेल; आठ आठवडे इतका पुरेसा साठा

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान भारताला कच्च्या तेलाची कमतरता भासणार नाही. भारताकडे सध्या

भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा एलिसा हेलीला विजयी निरोप

पर्थ : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिसऱ्या दिवशीच भारतीय महिला

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला