आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी भारत मोडीत काढणार

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्डकप २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात गतविजेता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. भारताने इंग्लंडचा, तर न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या दोन संघापैकी कोणता संघ वर्ल्ड कप उंचवणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघ मैदानावर उतरताच एक मोठा इतिहास रचणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येकी १४ वेळा फायनल खेळली आहे. या आयसीसी स्पर्धांमध्ये वनडे वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा समावेश आहे. रविवारी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर तो हा विक्रम मोडणार आहे. भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमधील आपला १५ वा अंतिम सामना खेळणार आहे. असे असले तरी ऑस्ट्रेलियाने १४ पैकी १० फायनल जिंकल्या आहेत. तर भारताने १७ पैकी ७ फायनल जिंकल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ ची फायनल ही पावसामुळे रद्द करण्यात आली होती.


आयसीसी फायनलमध्ये सर्वाधिक फायनल खेळणारे संघ




  1. ऑस्ट्रेलिया - १४ सामने  - १० विजय

  2. भारत - १४ सामने - ७ विजय

  3. वेस्ट इंडिज - ८ सामने ५ विजय

  4. इंग्लंड - ९ सामने ३ विजय

  5. श्रीलंका - ७ सामने ३ विजय

  6. न्यूझीलंड - ७ सामने २ विजय

  7. पाकिस्तान - ६ सामने ३ विजय

  8. दक्षिण अफ्रिका - ३ सामने २ विजय


आयसीसी टूर्नामेंटच्या फायनलमध्ये भारताचे विजय




  1. वनडे विश्वचषक १९८३: भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला.

  2. चॅम्पियन्स ट्रॉफी २००२: भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते.

  3. टी-२० विश्वचषक २००७: भारताने पाकिस्तानला मात दिली.

  4. वनडे विश्वचषक २०११: भारताने श्रीलंकेचा पराभव केला.

  5. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३: भारताने इंग्लंडला धूळ चारली.

  6. टी-२० विश्वचषक २०२४: भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवले.

  7. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: भारताने न्यूझीलंडचा पराभव केला.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिज, द. आफ्रिका आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू चार्टर विमानांनी परतणार मायदेशी

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सारखे संघ

T20 वर्ल्डकप फायनलसाठी कशी असेल अहमदाबादची खेळपट्टी ? कसे असेल हवामान आणि कोण कोणत्या खेळाडूंना मिळेल खेळण्याची संधी ?

अहमदाबाद : क्रिकेटप्रेमींसाठी ८ मार्चचा रविवार म्हणजे पर्वणी आहे. कारण आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता

आजचा ‘महामुकाबला’ कोण जिंकणार?

सुशील परब यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ

All England Open : 'लक्ष्य सेन'ने रचला इतिहास! सलग दुसऱ्यांदा ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक

लक्ष्य सेन याने २०२६ च्या ऑल इंग्लंड ओपनची अंतिम फेरी गाठत इतिहास रचला आहे. त्याने तीन सामन्यांच्या पुरुष

फक्त विजेतेपदासाठीच नाही; अनेक ऐतिहासिक शाप मोडण्यासाठीही भारत सज्ज!

मुंबई (प्रतिनिधी) : रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि

T20 World Cup 2026 Final Match : जाणून घ्या जिंकणाऱ्या संघाला किती कोटी मिळणार?

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार ८ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद