लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन


मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनांच्या मर्यादित संख्येवरून गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदारसंघातले प्रश्न मांडायला वाव मिळत नसल्याचा आरोप करीत, आमदारांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकरच गटनेत्यांची बैठक बोलावून लक्षवेधींची संख्या वाढवण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.


कामकाज सल्लागार समितीच्या निर्णयानुसार, यंदाच्या अधिवेशनात दररोज केवळ तीन ते पाच लक्षवेधी घेतल्या जात आहेत. मात्र, ही संख्या पुरेशी नसल्याची भावना सदस्यांमध्ये होती. गुरुवारी या नाराजीचा स्फोट सभागृहात झाला. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत विधानसभा अध्यक्षांकडे दाद मागितली. "लक्षवेधींची संख्या कमी केल्यामुळे आम्हाला मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न मांडता येत नाहीत. हा आमदारांवर अन्याय असून अध्यक्षांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून ही संख्या वाढवावी," अशी मागणी पाचपुते यांनी केली. त्यांच्या या भूमिकेला भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पाठिंबा दर्शवत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.


यावर स्पष्टीकरण देताना अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, "नियमानुसार एका दिवशी तीनच लक्षवेधी घेण्याची तरतूद आहे. मात्र, सदस्यांच्या भावना लक्षात घेता गेल्या काही वर्षांत आपण जास्तीत जास्त लक्षवेधी घेण्याचा प्रयत्न केला असून गेल्या अधिवेशनात विक्रमी कामकाज झाले आहे. कामकाज सल्लागार समितीने ठरवलेल्या विषयावर सभागृहात चर्चा करण्याची प्रथा नाही, तरीही आमदारांची मागणी रास्त आहे. त्यामुळे लक्षवेधींची संख्या वाढवण्याबाबत लवकरच सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा केली जाईल. नियमात तीनचा आकडा असला तरी, सदस्यांच्या आग्रहाखातर विशेषाधिकार वापरून संख्या वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल", असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची