राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार

शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना उमेदवारी; शरद पवारांनी घरातून भरला अर्ज, तावडे, आठवले, पार्थ पवारांसह महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल


मुंबई : राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी केवळ सातच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप-महायुतीकडून सहा आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्जांची छाननी आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ मार्च रोजी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल.


गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला होता. महायुतीकडून भाजपने चार, राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) एक आणि शिवसेनेने एक असे एकूण सहा अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार विधानभवनात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासात घरी जाऊन उमेदवारी अर्ज भरण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.


भाजपचे उमेदवार विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांनी राष्ट्रवादीच्या वतीने पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपले अर्ज सादर केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. अर्ज बाद होण्याचा धोका टाळण्यासाठी शरद पवार, पार्थ पवार आणि ज्योती वाघमारे यांनी प्रत्येकी दोन संच दाखल केले आहेत.

Comments
Add Comment

Split in MVA : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून मविआत फूट

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता उबाठा गटाने अंबादास दानवे यांची

Patra Chawl : पत्रा चाळ रहिवाशांना म्हाडाकडून १० टक्के भाडेवाढ मिळणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; इमारतींची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश मुंबई : गेल्या

Bamboo Plantation : कांजूरमार्गमधील कचरा दुर्गंधीवर ‘बांबू’ लागवडीचा उपाय

उपमुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश; कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची तातडीने कार्यवाही करण्याचे

Jai Konkan : भाजपच्या तेजिंदर सिंग तिवानाने महापालिकेत लावला जय कोकणचा नारा

अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात मालवणी भाषेतून मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पिय भाषणात

AC Local : मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या संख्येत वाढ, जाणून घ्या पनवेल - CSMT मार्गावर किती एसी लोकल धावणार ?

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी-पनवेल हार्बर

Baramati and Rahuri : बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले एवढ्या मताधिक्क्याने जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज

पुणे/अहिल्यानगर : राज्याच्या राजकीय पटलावर अत्यंत संवेदनशील ठरलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा