रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड उत्तर मिळाले. संजू सॅमसनच्या वादळी खेळीला इंग्लंडच्या जेकब बेथल अविश्वसनीय खेळीसह प्रत्युतर दिले. पण, जसप्रीत बुमराहची दोन षटकं राखून ठेवण्याचा डाव यशस्वी झाला आणि भारताने हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने शवेटच्या पाच षटकांत पुनरागमन केले आणि आता ८ मार्च रोजी जेतेपद कायम राखण्यासाठी न्यूझीलंडला भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होईल.



भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २५३ धावांचा डोंगर उभारला होता.तथापि २३ फेब्रुवारी २०२६ रोजी याच वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत २५४ धावा केल्या होत्या. ही वानखेडेवरील सर्वोच्च धावसंख्या गाठण्यास भारताला एक धाव कमी पडली. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी आणि फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी विक्रमी २५४ धावांचा यशस्वी पाठलाग करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना जेकब बेथल आणि विल जॅक्सने पूर्ण जोर लावला. पण भारतीय संघाने हा सामना ७ धावांनी जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.



इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावा करायच्या होत्या. इंग्लंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. फिल सॉल्ट अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. जोस बटलरने काही आकर्षक फटके मारले. पण तो २५ धावांवर बाद होऊन माघारी परतला. कर्णधार हॅरी ब्रुकही अवघ्या ७ धावांवर बाद झाला. टॉम बँटम १७ धावांवर माघारी परतला. शेवटी जेकब बेथल आणि विल जॅक्सने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून इंग्लंडला विजयाच्या जवळ पोहोचवले. विल जॅक्स ३५ धावा करून माघारी परतला. पण बेथलने दमदार शतकी खेळी केली आणि इंग्लंडला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. पण इंग्लंडचा थोडक्यात पराभव झाला.भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ७ बाद २५३ धावा उभ्या केल्या, ज्या वर्ल्ड कप नॉक आऊट फेरीतील सर्वोच्च धावसंख्या ठरल्या. संजू सॅमसनने ४२ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह ८९ धावांची वादळी खेळी केली. त्याने इशान किशनसह ४५ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. इशान १८ चेंडूंत ३९ धावा करून माघारी परतला. शिवम दुबेने २५ चेंडूंत ४३ धावा करताना १ चौकार व ४ षटकार लगावले. हार्दिक पांड्या ( २७), तिलक वर्मा ( २१) यांनीही चांगले योगदान दिले.


भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आजच्या डावात १९ षटकार खेचले. जे वर्ल्ड कपमधील एका डावातील संयुक्तपणे सर्वाधिक षटकार ठरले. हार्दिक पांड्याने दुसऱ्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला आणि फिल सॉल्टला ( ५) माघारी पाठवले. जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात कर्णधार हॅरी ब्रूकला ( ७) बाद केले. अक्षर पटेलने पळत जाऊन अविश्वसनीय झेल टिपला. बेथेलने सलग तीन षटकार खेचून वरूण चक्रवर्थीचे स्वागत केले. पण, त्याच षटकात बटरलचा ( २५) त्याने त्रिफळा उडवला.


अक्षर पटेलने आठव्या षटकात टॉम बँटनचा ( १७) त्रिफळा उडवून इंग्लंडला ९५ धावांवर चौथा धक्का दिला. जेकबने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि वर्ल्ड कपमधील इंग्लिश फलंदाजाकडून झालेले हे वेगवान अर्धशतक ठरले. इंग्लंडने ४ विकेट गमावल्या असल्या तरी त्यांच्या धावांची गती ही १२ च्या सरासरीने सुरू होती. जेकब व विल जॅक्स यांनी २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करताना भारतीय गोलंदाजांनाही दडपणाखाली ठेवले.


अर्शदीपने १४ व्या षटकात ७७ धावांची ही भागीदारी तोडली. विल जॅक्स २० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर झेलबाद झाला. आता सहा षटकांत ८२ धावा असा सामना इंग्लंडच्या हातून निसटताना दिसला. १५व्या षटकात १३ धावा आल्या आणि ३० चेंडू ६९ धावा असा सामना चुरशीचा झाला. जसप्रीतने १६ व्या षटकात फक्त ८ धावा देताना भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. अर्शदीपने १७व्या षटकात १६ धावा दिल्याने सामना १८ चेंडूंत ४५ धावा असा जवळ आला, परंतु जसप्रीतने १८व्या षटकात फक्त ६ धावा दिल्या आणि स्पेल ४-०-३३-१ असा संपवला.


आता १२ चेंडूंत ३९ धावा असा सामना भारताच्या हातात आलेला आणि हार्दिक १९ वे षटक फेकायला आला. बेथलने षटकाराने आपले शतक पूर्ण केले, त्याने ४५ चेंडूंत तिहेरी धावसंख्या गाठली. तिसऱ्या चेंडूवर सॅम कुरनचा ( १८) सीमारेषेवर तिलकने झेल टिपला. कुरन व बेथलने २७ चेंडूंत ५० धावा जोडल्या. हार्दिकने फक्त ९ धावा देत १ विकेट घेतली आणि मॅच ६ चेंडू ३० धावा अशी इंग्लंडच्या हातून निसटली. शिवम दुबेच्या पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बेथल रन आऊट झाला. त्याने ४८ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह १०५ धावांची अविश्वसनीय खेळी केली. भारताने ही मॅच जिंकून फायनलमध्ये प्रवेश पक्का केला. इंग्लंडने २० षटकांत ७ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारली आणि भारताने ८ धावांनी मॅच जिंकली.

Comments
Add Comment

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड

भारत ऐतिहासिक कामगिरी करणार ?

मुंबई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये २००७ पासून आतापर्यंत भारत तीन वेळा फायनलमध्ये धडकला आहे. टीम

Pakistan Player : खेळाडू की हैवान; पाकिस्तानी खेळाडूंकडून मैदानाबाहेर महिलांचा विनयभंग

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असला, तरी आता एका नव्या वादामुळे पाकिस्तानी खेळाडू

T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले.

मार्को जेन्सनच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका सुस्थितीत

कोलकाता : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-२० उपांत्य फेरीतील महत्त्वाच्या

T20 World Cup 2026 : इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी खेळाडूंनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील