मुद्दाम बेस्ट बस भांडुप स्टेशनबाहेरील पादचाऱ्यांवर चढवली, चालक संतोष सावंतवर आरोप करणारे ७०४ पानी आरोपपत्र दाखल

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर आणि लगतच्या बेस्ट बस स्टॉपवर प्रचंड गर्दी जमते, याची बेस्ट बस चालक संतोष रमेश सावंत याला पूर्ण कल्पना होती. हे माहीत असूनही त्याने इलेक्ट्रिक बस वेगाने प्रवाशांच्या अंगावर चढवली, त्यामुळे चौघा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, असे भांडुप पोलिसांनी ७०४ पानांच्या आरोपपत्रात नमूद केले आहे.


मुंबईतील भांडुप येथे २९ डिसेंबर २०२५ च्या रात्री ९.३० ते ९.४० दरम्यान भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर आणि लगतच्या बेस्ट बस स्टॉपवर बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. या प्रकरणात बस चालक असलेल्या ५२ वर्षांच्या संतोष सावंतला पोलिसांनी अटक केली. आता पोलिसांनी चौकशीअंती चालक संतोष सावंतवर मुद्दाम बेस्ट बस भांडुप स्टेशनबाहेरील पादचाऱ्यांवर चढवल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्यांचे ७०४ पानांचे आरोपपत्र मुलुंड येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले आहे. आरोपपत्रात बस चालक संतोष सावंत याने जाणूनबुजून आणि उद्देशपूर्वक बेस्ट इलेक्ट्रिक बसचा हत्यारासारखा वापर करुन पोलिस चौकीच्या मागच्या वळणावरुन वेगाने गाडी दामटवली आणि थांब्यावर वाट पाहणाऱ्या प्रवाशांना धडक दिली असा आरोप आहे.


रात्रीच्या गस्तीवर असलेले तक्रारदार बीट मार्शल सुधीर पाटील यांनी दिलेला आरोपपत्रात नोंदवला आहे. या जबाबानुसार चालकाला धोका असल्याची जाणीव असूनही त्याने जाणूनबुजून आणि बेपर्वाईने प्रवाशांना गाडीने चिरडले. तपास अधिकारी पीएसआय संतोष चाटे यांनी सांगितलं की, संतोष सावंत याला त्याच्या कृत्यामुळे इतरांचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत होण्याची जाणीव असूनही त्याने गाडी चालवली. धडकेमुळे बस स्टॉपचा खांब वाकला आणि अनेक जण बसखाली अडकले. जखमींना राजावाडी आणि मुलुंड रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तीन महिला आणि एक पुरुष अशा चौघांना मृत घोषित करण्यात आलं.


संतोष सावंत याच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार बेपर्वाईने वाहन चालवण्यासोबतच गंभीर दुखापत आणि जीवास धोका निर्माण केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे, रुग्णालयातील नोंदी, फॉरेन्सिक निष्कर्ष, आरटीओ तपासणी अहवाल आणि सायन रुग्णालयात केलेल्या मानसिक आरोग्य मूल्यांकनांवरुन निष्कर्ष काढला आहे. अंतिम मानसिक चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.

Comments
Add Comment

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी