मुद्दाम बेस्ट बस भांडुप स्टेशनबाहेरील पादचाऱ्यांवर चढवली, चालक संतोष सावंतवर आरोप करणारे ७०४ पानी आरोपपत्र दाखल

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर आणि लगतच्या बेस्ट बस स्टॉपवर प्रचंड गर्दी जमते, याची बेस्ट बस चालक संतोष रमेश सावंत याला पूर्ण कल्पना होती. हे माहीत असूनही त्याने इलेक्ट्रिक बस वेगाने प्रवाशांच्या अंगावर चढवली, त्यामुळे चौघा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, असे भांडुप पोलिसांनी ७०४ पानांच्या आरोपपत्रात नमूद केले आहे.


मुंबईतील भांडुप येथे २९ डिसेंबर २०२५ च्या रात्री ९.३० ते ९.४० दरम्यान भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर आणि लगतच्या बेस्ट बस स्टॉपवर बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. या प्रकरणात बस चालक असलेल्या ५२ वर्षांच्या संतोष सावंतला पोलिसांनी अटक केली. आता पोलिसांनी चौकशीअंती चालक संतोष सावंतवर मुद्दाम बेस्ट बस भांडुप स्टेशनबाहेरील पादचाऱ्यांवर चढवल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्यांचे ७०४ पानांचे आरोपपत्र मुलुंड येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले आहे. आरोपपत्रात बस चालक संतोष सावंत याने जाणूनबुजून आणि उद्देशपूर्वक बेस्ट इलेक्ट्रिक बसचा हत्यारासारखा वापर करुन पोलिस चौकीच्या मागच्या वळणावरुन वेगाने गाडी दामटवली आणि थांब्यावर वाट पाहणाऱ्या प्रवाशांना धडक दिली असा आरोप आहे.


रात्रीच्या गस्तीवर असलेले तक्रारदार बीट मार्शल सुधीर पाटील यांनी दिलेला आरोपपत्रात नोंदवला आहे. या जबाबानुसार चालकाला धोका असल्याची जाणीव असूनही त्याने जाणूनबुजून आणि बेपर्वाईने प्रवाशांना गाडीने चिरडले. तपास अधिकारी पीएसआय संतोष चाटे यांनी सांगितलं की, संतोष सावंत याला त्याच्या कृत्यामुळे इतरांचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत होण्याची जाणीव असूनही त्याने गाडी चालवली. धडकेमुळे बस स्टॉपचा खांब वाकला आणि अनेक जण बसखाली अडकले. जखमींना राजावाडी आणि मुलुंड रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तीन महिला आणि एक पुरुष अशा चौघांना मृत घोषित करण्यात आलं.


संतोष सावंत याच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार बेपर्वाईने वाहन चालवण्यासोबतच गंभीर दुखापत आणि जीवास धोका निर्माण केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे, रुग्णालयातील नोंदी, फॉरेन्सिक निष्कर्ष, आरटीओ तपासणी अहवाल आणि सायन रुग्णालयात केलेल्या मानसिक आरोग्य मूल्यांकनांवरुन निष्कर्ष काढला आहे. अंतिम मानसिक चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.

Comments
Add Comment

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून,

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या