मुंबई उपनगरातील बांग्लादेशींवर नजर ठेवण्यासाठी विधानसभा निहाय समित्या गठित; मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतानाच फेरीवाल्यांपासून याची सुरुवात केली जाणार आहे. मुंबईच्या महापोर रितू तावडे यांनी फेरीवाल्यांमधील वाढत्या बांग्लादेशींना हटवण्यात येईल अशी घोषणा केली आहे. ही कारवाई तीव्र केली जात असली तरी उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपनगरातील सर्व भागातील बांग्लादेशींचा शोध घेण्यासाठीविशेष समित्यांची स्थापना करण्यात आल्याचे जाहिर केले. उपनगरातील २४ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण २४ समित्या स्थापन करण्यात आल्या असून, तसेच या समितीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र विशेष समितीही गठित करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ही माहिती दिली. मालाड आणि जोगेश्वरी परिसरात फेरीवाले तसेच मजुरी करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या व्यक्तींकडे जन्म प्रमाणपत्र किंवा आधारकार्ड यांसारखी अधिकृत कागदपत्रे नसल्याचे आढळून येत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.


उपनगरात एकूण २४ विधानसभा मतदारसंघ असून जोगेश्वरी, कुर्ला, अंधेरी, मालाड आदी रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या स्वरूपात बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध कंत्राटदारांमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्यांमध्येही अशा नागरिकांचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या पार्श्वभूमीवर प्रत्येक विधानसभा स्तरावर समित्या स्थापन करून संबंधित भागातील संशयितांची माहिती गोळा केली जाणार आहे. या २४ समित्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली विशेष समिती दरमहा अहवाल सादर करणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. ओळख पटलेल्या बांगलादेशी नागरिकांना कायदेशीर प्रक्रियेनुसार परत पाठविण्याची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचा दावा करताना, विशेषतः फेरीवाल्यांमुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी फेरीवाल्यांकडून खरेदी करणेही काही ठिकाणी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे भाजप आता उपनगरातील बेकायदेशीर वास्तव्यासंबंधीचा प्रश्न गांभीर्याने हाताळणार असून, संबंधितांवर कारवाईसाठी या समित्या कार्यरत राहतील, असे लोढा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा