मुंबई उपनगरातील बांग्लादेशींवर नजर ठेवण्यासाठी विधानसभा निहाय समित्या गठित; मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतानाच फेरीवाल्यांपासून याची सुरुवात केली जाणार आहे. मुंबईच्या महापोर रितू तावडे यांनी फेरीवाल्यांमधील वाढत्या बांग्लादेशींना हटवण्यात येईल अशी घोषणा केली आहे. ही कारवाई तीव्र केली जात असली तरी उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपनगरातील सर्व भागातील बांग्लादेशींचा शोध घेण्यासाठीविशेष समित्यांची स्थापना करण्यात आल्याचे जाहिर केले. उपनगरातील २४ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण २४ समित्या स्थापन करण्यात आल्या असून, तसेच या समितीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र विशेष समितीही गठित करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ही माहिती दिली. मालाड आणि जोगेश्वरी परिसरात फेरीवाले तसेच मजुरी करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या व्यक्तींकडे जन्म प्रमाणपत्र किंवा आधारकार्ड यांसारखी अधिकृत कागदपत्रे नसल्याचे आढळून येत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.


उपनगरात एकूण २४ विधानसभा मतदारसंघ असून जोगेश्वरी, कुर्ला, अंधेरी, मालाड आदी रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या स्वरूपात बांगलादेशी नागरिकांचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध कंत्राटदारांमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्यांमध्येही अशा नागरिकांचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या पार्श्वभूमीवर प्रत्येक विधानसभा स्तरावर समित्या स्थापन करून संबंधित भागातील संशयितांची माहिती गोळा केली जाणार आहे. या २४ समित्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली विशेष समिती दरमहा अहवाल सादर करणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. ओळख पटलेल्या बांगलादेशी नागरिकांना कायदेशीर प्रक्रियेनुसार परत पाठविण्याची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचा दावा करताना, विशेषतः फेरीवाल्यांमुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी फेरीवाल्यांकडून खरेदी करणेही काही ठिकाणी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे भाजप आता उपनगरातील बेकायदेशीर वास्तव्यासंबंधीचा प्रश्न गांभीर्याने हाताळणार असून, संबंधितांवर कारवाईसाठी या समित्या कार्यरत राहतील, असे लोढा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता

Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा