द्राक्ष पिकाच्या संरक्षणासाठी तासगाव व नाशिक येथे विशेष केंद्रांच्या मागणीचा सकारात्मक

मुंबई : राज्यातील द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्यासाठी झालेल्या कराराच्या माध्यमातून राज्य शासनाने यासंदर्भात काही ठोस धोरण राबविणे गरजेचे आहे आणि त्याबाबत काही सूचना आमदार रोहित पाटील यांनी सभागृहात मांडल्या. द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने टेबल ग्रेप साठी तासगाव येथे तर वाईन ग्रीप साठी नाशिक येथे विशेष केंद्र निर्माण करण्याचे धोरण तयार केले आहेत त्यावर शासनाने विचार करावा अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी केली.


सभागृहात उत्तर देताना कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, आमदार रोहित पाटील यांनी केलेल्या सूचनांची शासनामार्फत सविस्तर माहिती घेतली जाईल. त्याचप्रमाणे आमदार रोहित पाटील यांच्यासोबत स्वतंत्र बैठक आयोजित करून त्यांनी मांडलेल्या सूचनांवर सविस्तर चर्चा करून या बाबीवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी सभागृहात दिले.


राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी संशोधन, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध असून या संदर्भातील सर्व सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल, असेही राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती