तेहरान : इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इराणी सरकारी माध्यमांनी खामेनी यांच्या निधनाची पुष्टी केली असून, त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांसह त्यांच्या मुलगी आणि जावईंचा देखील मृत्यू झाला आहे. इराण सरकारने ४० दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला आहे आणि ७ दिवसांची सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे.
इराणी सरकारी दूरचित्रवाणी आणि अधिकृत वृत्तसंस्था आयआरएनएने ८६ वर्षीय खामेनी यांच्या निधनाची माहिती दिली, परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी सांगितले की खामेनी यांचा मृत्यू अमेरिका-इस्रायली संयुक्त कारवाईत झाला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने या हल्ल्यात मारल्या गेलेल्या सात वरिष्ठ इराणी संरक्षण नेत्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अली शामखानी, मोहम्मद पाकपौर, सालेह असादी, मोहम्मद शिराजी, अझीझ नासिरजादेह, हुसेन जबल अमेलियन आणि रेझा मुझफ्फर-निया यांचा समावेश आहे.
खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोकाची लाट पसरली आहे. इराणी माध्यमांनी म्हटले की, "देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाले आहे." त्यांच्या निधनामुळे देशभर ४० दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला गेला आहे. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेल्या खामेनीचा मृत्यू झाला आहे. irans-supreme-leader-khamenei हा न्याय फक्त इराणच्या लोकांसाठी नाही, तर खामेनी आणि त्याच्या रक्तपिपासू टोळीने मारलेल्या किंवा त्रास दिलेल्या सर्व लोकांसाठी आहे."
इस्त्रायल-इराण संघर्षावर भारताची बारीक नजर; दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद
तेहरान, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाचे रूपांतर आता हिंसक संघर्षात झाले आहे. रविवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि इतर उच्चपदस्थ नेतृत्व अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेले आहेत, या दाव्याला इराणी माध्यमांनी दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर जगभरातील शिया मुस्लिमांनी अमेरिकेच्या हल्ल्यांवर टीका केली आणि त्यांना अति हिंसक म्हटले.
भारताने या तणावावर तात्काळ प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि तणाव वाढू नये असे आवाहन केले. भारताने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये म्हटले आहे की सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. शिवाय, भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजनैतिकतेला चालना देण्याची गरज आहे. भारताने वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याची आणि युद्ध टाळण्याची विनंती केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की इराण आणि आखाती प्रदेशातील अलिकडच्या घडामोडींबद्दल भारत चिंतित आहे. मंत्रालयाने सर्व देशांना संयम बाळगण्याचे तसेच चर्चेतून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.







