नागपूरच्या गनपावडर कारखान्यात स्फोट, १७ ठार

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून होलिकोत्सवाच्या आदल्या दिवशी एक दुःखद बातमी आली आहे. नागपूर जिल्ह्यातील एसबीएल एनर्जी एक्सप्लोजिव्हज या गनपावडर तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आणि १८ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले.


नागपूर दुर्घटनेप्रकरणी नियमानुसार पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये सानुग्रह मदत तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील दुर्घटनेप्रकरणी नियमानुसार मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करून केली आहे. कंपनीकडूनही मृतांच्या वारसांना आणि जखमींना मदत दिली जाणार आहे.


नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे एसबीएल एनर्जी एक्सप्लोजिव्हज या गनपावडर तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. खाणकाम आणि औद्योगिक स्फोटके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला. घटना सकाळी सात ते सव्वासातच्या दरम्यान घडली. खाणकामासाठी तसेच विविध औद्योगिक कामासाठी कारखान्यात गनपावडरची निर्मिती सुरू होती. हे काम सुरू असताना दुर्घटना झाली. माहिती मिळताच जिल्हाधिकारी विपिन इटनकर आणि एसपी पोदार घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला.

Comments
Add Comment

कांगारूंनी भारतीय महिलांचा उडवला धुव्वा!

होबार्ट : ऑस्ट्रेलियन महिला संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर भारतीय महिला संघाला पूर्णपणे

अमेरिका - इराण युद्धाचा वर्ल्डकपवर परिणाम, आयसीसीची यंत्रणा लागली कामाला

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात संयुक्तपणे हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणकडून

T20 World Cup 2026 Ind vs WI : दोन्ही संघासाठी करो वा मरोची लढत; जाणून घ्या Playing XI मध्ये कोणाकोणाची समावेश

टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून ग्रुप ए मधील फक्त दोन सामने बाकी आहेत. यामध्ये एक

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या