औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा


वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध समस्यांचा सामना करीत आहेत. या संदर्भात अनेकदा बैठका घेऊन झाल्या आहेत. मात्र योग्य उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे २५ हजार लघू व मध्यम उद्योगांसमोरील अडचणी विधान भवनातील सभागृहात मांडल्या.


उद्योगांना दिलेल्या जागेची लीजची मुदत संपली असून आताच्या बाजार भावाप्रमाणे लीजची रक्कम परवडणारी नसल्याने सध्याच्याच दरात लीज वाढवण्याचे धोरण राबवावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. तसेच औद्योगिक क्षेत्रात पक्के रस्ते, सांडपाणी - कचरा व्यवस्थापन आणि अखंडित वीज पुरवठा यांसाठी स्वतंत्र डीपीआर तयार करून विशेष निधी देण्याची मागणीही त्यांनी केली.


त्याचप्रमाणे राज्य सरकारने सन २०२४-२५ मध्ये १ लाख ६४ हजार कोटींची परकीय गुंतवणूक आणि ९१ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केल्याबद्दल तसेच ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केल्याबद्दल आमदार दुबे पंडित यांनी शासनाचे अभिनंदन केले. उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या दिशेने राज्याची वाटचाल सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.


त्यानंतर त्यांनी वसई औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांवर शासनाचे लक्ष वेधले. पोमण, मालजीपाडा व नायगाव परिसरातील स्टुडिओ क्षेत्राला सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी द्यावा, अशी विनंती त्यांनी शासनाकडे केली. तसेच महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत वसईत एमआयडीसी स्थापन करावी महिला व मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय सुरू करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.


त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक वनपट्टे वितरित झाले असून बांबू उद्योग धोरण २०२५ अंतर्गत वनपट्टाधारकांना रोजगार हमी किंवा सीएसआर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान शबरी आदिवासी घर कुल योजना पालघर, नाशिक व ठाणे जिल्ह्यांनाही लागू करावी, अशीही मागणी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी केली.

Comments
Add Comment

उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

‘दहशतवादाचा नकाशा बदलला’; जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान जगात अव्वल

- जीटीआय अहवालातून समोर आले धक्कादायक आकडे जागतिक दहशतवादाच्या चित्रात मोठा बदल होत असून पाकिस्तान आता जगातील

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत