प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित


नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गंगा आणि यमुना नद्यांबाबत एक अतिशय चिंताजनक जागतिक अहवाल समोर आला आहे. ब्राझीलमधील साओ पाउलो फेडरल युनिव्हर्सिटीच्या ताज्या अभ्यासानुसार, जगातील ४६ टक्के नद्या इतक्या प्रदूषित झाल्या आहेत की, त्यातील पाणी आता पिण्यासाठीच नव्हे, तर स्नानासाठीही अयोग्य ठरले आहे. या भीषण यादीत भारताच्या पवित्र नद्यांचा समावेश असल्याने पर्यावरणप्रेमींनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.


अहवालानुसार, दरवर्षी गंगेच्या पात्रात सुमारे ६ लाख टन कचरा टाकला जातो. उत्तराखंडमधील ऋषीकेश आणि हरिद्वारसारख्या धार्मिक क्षेत्रांसह डेहराडूनमधील रिस्पना, बिंदाल, आसन आणि ससुआ यांसारख्या एकेकाळच्या मुख्य जलस्रोतांची अवस्था आता प्लास्टिक आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे 'नाल्यां'सारखी झाली आहे. उत्तराखंड सरकारसाठी हे संकट दुहेरी आहे. आगामी चारधाम यात्रा आणि २०२७ चा कुंभमेळा जवळ येत असताना, नद्यांची ही दुरवस्था भाविकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकते. कोट्यवधी भाविक गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी येतात; परंतु दूषित पाण्यामुळे त्वचेचे रोग आणि इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. उत्तराखंड प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पराग मधुकर धकाते यांनी या परिस्थितीवर आणीबाणीच्या स्वरूपात पावले उचलली आहेत. सांडपाणी प्रक्रिया न करता नद्यांत सोडणाऱ्या कारखान्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. जे व्यावसायिक प्रतिष्ठान कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळत नाहीत, त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे. केवळ सरकारी प्रयत्नांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत, तर नागरिकांनीही या मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.



प्रदूषणाची भीषण आकडेवारी 


घटक


जागतिक स्थान गंगेत दरवर्षी जाणारा कचरा मुख्य कारणे लक्ष्य



 सद्यस्थिती


जगातील सर्वात प्रदूषित ४६% नद्यांच्या यादीत   गंगेत दरवर्षी जाणारा कचरा ६ लाख टन पाण्याची गुणवत्ता पिण्यासाठी आणि स्नानासाठी अत्यंत धोकादायक

अनियंत्रित शहरीकरण, औद्योगिक सांडपाणी आणि  अतिक्रमण


लक्ष्य कुंभमेळा २०२७ पूर्वी नदी शुद्धीकरण


Comments
Add Comment

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने