थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला लागला असून हळू हळू गरमीच्या ऋतूला सुरुवात होते आहे.


मुंबईत हवामान काही दिवस उष्ण आणि दमट राहणार असून तापमानाचा पारा ३२ अंशाच्या पार जाणार आहे, बदलत वातावरण, कोरड हवामान शिवाय हवेची खराब गुणवत्ता यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळी घ्यावी.


पुण्यातही हवापालट झाली आहे. हवामान कोरडे आणि उष्ण राहणार असून पारा हा ३३ अंशांपर्यत पोहोचणार आहे. सकाळी काहीसा गारवा तर दुपारी कडक ऊन पुणेकरांना येत्या काही दिवसात असे विचीत्र हवामान अनुभवायला मिळणार आहे.


 



 

उत्तर महाराष्ट्रात हवामान काही ठिकाणी हिटवेव्हचा अलर्ट देण्यात असून दिवसभर कडक ऊन आणि रात्री थंड वातावरण राहील आणि पारा ३४ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


मराठवाडा आणि विदर्भ तापमानाचा पारा हा ३६ अंधांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कडक उन्हामुळे हिटव्हेव सारखी गंभीर परिस्तिथी उदभवू शकते, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे.


वातावरण बदलत जात आहे, थंडी कमी होऊन आता उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात होते आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे.

Comments
Add Comment

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित

RO-RO Ferry : मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल्ल' बुकिंग

- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ! मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग

Yogesh Kadam : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्यात कोम्बिंग ऑपरेशन! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

मुंबईत 'टास्कफोर्स' तैनात; दाट वस्त्यांमध्ये शोधमोहीम मुंबई : राज्यातील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी

ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या

Madhuri Misal : भटक्या श्वानांच्या उपद्रवावर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात घोषणा

शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणार मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या