मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला लागला असून हळू हळू गरमीच्या ऋतूला सुरुवात होते आहे.
मुंबईत हवामान काही दिवस उष्ण आणि दमट राहणार असून तापमानाचा पारा ३२ अंशाच्या पार जाणार आहे, बदलत वातावरण, कोरड हवामान शिवाय हवेची खराब गुणवत्ता यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळी घ्यावी.
पुण्यातही हवापालट झाली आहे. हवामान कोरडे आणि उष्ण राहणार असून पारा हा ३३ अंशांपर्यत पोहोचणार आहे. सकाळी काहीसा गारवा तर दुपारी कडक ऊन पुणेकरांना येत्या काही दिवसात असे विचीत्र हवामान अनुभवायला मिळणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात हवामान काही ठिकाणी हिटवेव्हचा अलर्ट देण्यात असून दिवसभर कडक ऊन आणि रात्री थंड वातावरण राहील आणि पारा ३४ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाडा आणि विदर्भ तापमानाचा पारा हा ३६ अंधांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कडक उन्हामुळे हिटव्हेव सारखी गंभीर परिस्तिथी उदभवू शकते, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
वातावरण बदलत जात आहे, थंडी कमी होऊन आता उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात होते आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे.