महानगरपालिकेच्या सर्वच कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे पूर्ण राष्ट्रीय गीत वाजणार, सभागृहात केला ठराव मंजूर

मुंबई: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणादायी आणि शक्तीशाली नारा ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताबाबत केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये आता ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण सहा कडव्यांसह गायन केले जाणार आहे. हे राष्ट्रीय गीत बंधनकारक करण्यासंदर्भात महापालिका सभागृहात ठराव करून त्याला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसात याची अंमलबजावणी होताना दिसणार आहे. महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी ठरावाच्या सूचनद्वारे ही मागणी केली होती आणि त्याला महापौर रितू तावडे यांनी मंजुरी दिली आहे.


महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी महापालिका सभागृहात ठरावाच्या सुचनेद्वारे ही मागणी करताना, ‘वंदे मातरम्’ हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी रचले होते. या गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्र शासनाने त्याच्या गायन आणि वादनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार सर्व सरकारी कार्यक्रम, अधिकृत समारंभ, राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या कार्यक्रमांमध्ये तसेच शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’चे तीन मिनिटे दहा सेकंदांचे संपूर्ण सहा कडव्यांसह गायन करणे बंधनकारक करण्यात आले असून, त्या वेळी सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहणे आवश्यक आहे.


याच धर्तीवर, महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रम, महापालिकेच्या शाळांमधील समारंभ तसेच इतर अधिकृत कार्यक्रमांमध्येही ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण सहा कडव्यांसह वादन व गायन अनिवार्य करण्यात यावे, असे मत व्यक्त केले आले आहे. विशेषतः महापौर, आयुक्त किंवा अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांपूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजविण्याची सक्ती असावी, अशीही सूचना खणकर यांनी केली होती.


या संदर्भात संबंधित प्रशासनाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती, यांना महापौर रितू तावडे यांनी मंजुरी देत याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात त्वरीत अहवाल देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’चा निनाद घुमलेला पाहायला मिळेल.

Comments
Add Comment

Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत

- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफ‍िक

Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन

Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन