Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमांचलमधील घुसखोरीच्या प्रश्नावर कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले. ते बिहारमधील अररिया येथे एसएसबीच्या जवानांना संबोधित करताना बोलत होते. त्यांनी सांगितले की घुसखोरीमुळे या भागाच्या लोकसंख्यात्मक रचनेत बदल झाला असून तो कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.


जवानांना संबोधित करताना त्यांनी सीमा सुरक्षा मजबूत ठेवण्याबरोबरच अवैध तस्करी, अमली पदार्थांची तस्करी (नार्कोटिक्स) आणि इतर गुन्हेगारी कारवायांवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या. यासाठी स्पष्ट एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, जेणेकरून खालच्या स्तरापर्यंत तैनात असलेले जवान पूर्णपणे सतर्क राहतील. खुल्या सीमांची सुरक्षा ही मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी नमूद केले.





अमित शाह म्हणाले की बिहारच्या जनतेशी निवडणुकीदरम्यान घुसखोरांना बाहेर काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते आणि ते केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नव्हते. प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्याला भारताच्या भूमीतून बाहेर केले जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सीमांचल भागात या संदर्भातील कारवाई लवकरच सुरू होणार आहे.


यापूर्वी अमित शाह यांनी किशनगंज जिल्ह्यातील पूर्व पाली येथील हनुमान मंदिरात पूजा-अर्चना केली. या वेळी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते.


Comments
Add Comment

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

WhatsApp लॉगिन फेल, मेसेज मिळेनात! मेसेजिंग अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामं ठप्प

WhatsApp वेब वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. Downdetector या संकेतस्थळावर या

Yogi Adityanath : सिंगापूर - जापान दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी केले ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंगापूर आणि जपानचा चार दिवसांचा दौरा पूर्ण केला. दोन्ही

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या