महापालिका सभागृहात गुंजणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’; महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर

मुंबई: महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची धून आता महापालिका सभागृहातही लावली जाणार आहे. भाजपच्या नगरसेविका आणि शिक्षण समिति अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी केलेल्या सूचनेला मंजुरी देत महापालिका सभागृहात एकमताने याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे आता महापालिका सभागृहात या राज्यगीताची धून ऐकायला मिळणार आहे.


महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्रातील जनतेच्या अभिमानाचे प्रतीक असून ते ऐकताच प्रत्येक मराठी मन अभिमानाने भरून येते. शासनाच्या निर्णयानुसार हे गीत शासकीय कार्यक्रमांमध्ये तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये सकाळच्या परिपाठाचा अनिवार्य भाग करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, मराठी अस्मिता आणि संस्कृतीची जपणूक यांची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.


मराठी भाषा संवर्धन आणि सांस्कृतिक अस्मितेच्या जतनासाठी कवी राजा बढे यांच्या ओजस्वी शब्दरचनेतून आणि शाहीर साबळे यांच्या दमदार आवाजातून साकारलेले हे गीत नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे गरजेचे असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात राष्ट्रगीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून वाजविण्यात यावी, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी महापालिका सभागृहात केली. ही सूचना महापौरांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत मंजूर केली.


या प्रस्तावामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिमानाची नवी भर पडेल, असा विश्वास शिरवडकर यांनी व्यक्त केला होता. या ठरावामुळे याची अंमलबजावणी लवकरच महापालिका सभागृहात केली जाणार आहे.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेवर आज वांद्रे येथे 'मेजर ब्लॉक'

मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान 'जम्बो ब्लॉक मुंबई : वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे दरम्यान असलेल्या मोऱ्या

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न