मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुण्यातील पासपोर्ट कार्यालय आणि मुंबईतील दहिसर परिसरातील एका नामांकित शाळेला लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.



पुण्यात पासपोर्ट कार्यालयाला धमकी


रिजनल पासपोर्ट ऑफिस पुणे येथील अधिकृत ई-मेल आयडीवर गुरुवारी सकाळी स्फोटकांच्या वापराचा उल्लेख असलेला संदेश प्राप्त झाला. बाणेर–पाषाण लिंक रोड परिसरातील या कार्यालयात RSX स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आल्याचे समजते.


माहिती मिळताच पुणे पोलिसांनी यांनी तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाठवले. कार्यालय, पार्किंग तसेच आसपासच्या परिसराची सखोल तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळली नसल्याने प्रशासनाने दिलासा व्यक्त केला. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे.



दहिसरमधील शाळेला ई-मेल


दरम्यान, मुंबईतील JBNC इंटरनॅशनल शाळेलाही अशाच प्रकारचा धमकीचा संदेश प्राप्त झाला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळा प्रशासनाने तात्काळ सुट्टी जाहीर केली आणि संपूर्ण परिसर सील करण्यात आला. दरम्यान मुंबई उपनगरातील सुमारे २२ ते २५ शाळांना अशाच प्रकारचे धमकीचे ई मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई उपनगरातील सुमारे २२ ते २५ शाळांना अशाच प्रकारचे धमकीचे ई मेल पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या सर्व ई- मेलचा एकमेकांशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.



तपास यंत्रणा अलर्टवर


गेल्या काही महिन्यांत महत्त्वाच्या सरकारी आणि शैक्षणिक संस्थांना अशा प्रकारचे ई-मेल येण्याच्या घटना वाढल्या आहेत. बहुतांश प्रकरणे अफवा ठरली असली तरी प्रत्येक घटनेकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि संशयास्पद बाब त्वरित कळवण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

१ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने