कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी आतापर्यंत २८०९.८३ कोटी रुपये खर्च झाले असून, हे प्रमाण एकूण निधीच्या ३५ टक्के इतके आहे. विधान परिषदेत आमदार अरुण लाड, परिणय फुके आणि सत्यजित तांबे यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही आकडेवारी सादर केली. राज्याच्या उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा मोठा असूनही, प्रत्यक्ष निधी वितरण आणि खर्च यामध्ये तफावत असल्याचे या चर्चेतून समोर आले आहे.



शेतकरी लाभार्थी आणि महाडीबीटी प्रक्रिया


कृषी योजनांच्या लाभासाठी गेल्या तीन वर्षांत (२०२२ ते २०२५) राज्यातील ५६.१७ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १८.४६ लाख पात्र लाभार्थ्यांना ६५२१.४१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. महाडीबीटी पोर्टलवर सध्या 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वानुसार ४९.७१ लाख लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्यासाठी ३३३९.१८ कोटींची देयके अपलोड करण्यात आली आहेत. या अनुदानाचे वाटप करण्याची प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.



निधीची कमतरता आणि प्रलंबित मागणी


शेतकऱ्यांकडून आलेल्या सर्व अर्जांचा विचार करता, या योजनांसाठी सुमारे ४४ हजार ६६७ कोटी रुपयांच्या अवाढव्य निधीची आवश्यकता आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या निधीतून टप्प्याटप्प्याने मदत दिली जात आहे. पिक विमा, यांत्रिकीकरण आणि सिंचन यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ अजूनही अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. १ डिसेंबर २०२५ पासून आतापर्यंत ९ हजार नवीन लाभार्थ्यांना ४७.७७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला