सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष, आवाजी मतदानाने निवड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबईत वरळीच्या डोममधील हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे देशातील सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, पार्थ पवार हे पण बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष या पदासाठी सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव सादर झाला. या प्रस्तावावर आवाजी मतदान झाले आणि सर्वानुमते सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. या निवडीमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनेत्रापर्व सुरू झाले.





बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदान झाले आणि सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली.


अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा भरारी घेईल, असा विश्वास कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. ज्यांचं आमच्या पक्षाशी काहीही देणंघेणं नाही, ते आम्हाला उपदेश करत आहेत. महिन्याभरात तुम्ही पाहिलंच असेल. काही जण इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक, अशी परिस्थिती आहे, असं म्हणत पटेलांनी रोहित पवारांचा नाव न घेता समाचार घेतला.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झालं. मुंबईहून बारामतीला जात असताना अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला. त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबद्दलची चर्चा सुरु झाली. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.

Comments
Add Comment

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत