Budget Session : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आलेल्या प्रश्नांची उत्तरं हे दोन मंत्री देणार

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २३ फेब्रुवारी पासून सुरु झाले आहे. सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्पीय सादर करतील.

अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिवेशन काळापुरता आपल्याकडील खात्यांचा कार्यभार सहकारी मंत्र्यांकडे सोपवला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वतीने दोन मंत्री प्रश्नांची उत्तरं देतील.

राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या संबंधित प्रश्नांची उत्तर मंत्री हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण मंत्री), क्रीडा आणि युवक कल्याण विभागाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं मंत्री दत्तात्रय भरणे (कृषी मंत्री), आणि अल्पसंख्याक आणि औकाफ विभागाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं मंत्री दत्तात्रय भरणे (कृषी मंत्री) देतील.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून सुनेत्रा पवार यांनी पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपवत असल्याची माहिती दिली.
Comments
Add Comment

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

‘दहशतवादाचा नकाशा बदलला’; जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान जगात अव्वल

- जीटीआय अहवालातून समोर आले धक्कादायक आकडे जागतिक दहशतवादाच्या चित्रात मोठा बदल होत असून पाकिस्तान आता जगातील

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर