मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा १ मार्चपासून सुरू होणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडण्यासाठी राज्य शासनाने जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नियोजन सुरू आहे. सुरक्षेचे आवश्यक ते उपाय करून, पुरेशी खबरदारी घेऊन रविवार १ मार्च २०२६ पासून मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू करत आहोत, अशी घोषणा राज्याचे मत्स व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली. लवकरच मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड अशा विविध मार्गांवर जलवाहतूक सुरू करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.


मुंबई ते विजयदुर्ग या रो रो सेवेच दर आणि वेळापत्रक या संदर्भातली माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिकिटांचे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


शिमोगोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रो रो हा एक सुरक्षित आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा पर्याय उपलब्ध आहे. नागरिक याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत आणि यापुढेही उत्साहवर्धक प्रतिसाद असेल असे दिसत आहे. रो रो सेवेच्या माध्यमातून मुंबईला अन्य राज्यांबरोबर जोडण्याचे काम आणि पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचे काम होणार आहे.


रो रो सेवेमुळे मुंबई ते कोकण प्रवास वेगाने करता येईल. वेळेची बचत होण्यास मदत होईल.  आंबा, काजू, मासेमारी व्यवसायाला चालना मिळेल. पर्यटन आणि रोजगाराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल. पर्यावरणपूरक विकास हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून रो रो सेवेचे नियोजन सुरू असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.

Comments
Add Comment

BDD Chawl Parking Issue : बीडीडी चाळ पार्किंग प्रश्नावर विधानपरिषदेत सकारात्मक पाऊल!

- नायगाव आणि डिलाईल रोडच्या रहिवाशांच्या समाधानासाठी लवकरात लवकर विशेष बैठक घेणार; मंत्र्यांचे आश्वासन मुंबई :

Nashik Crime : फेसबुकवर मैत्री झाली , WhatsAppवर जवळीक वाढली; 'महिला CEO'ने आधी विश्वास जिंकला, मग सेवानिवृत्तासह तिघांना....

Nashik Crime : सेवानिवृत्तीनंतर निवांत आयुष्य जगत असताना सोशल मीडियावर आलेली एक फ्रेंडशिप रिक्वेस्ट आयुष्यभराची कमाई

Uday Samant : केंद्रात शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळाल्यास निश्चितच आनंद!

- मंत्रिपदांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील : मंत्री उदय सामंत मुंबई :

Maharashtra Weather : महाराष्ट्रात ६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यावर रेड-ऑरेंज अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार ३० जून ते ६ जुलैदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची

Ravindra Chavan : सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपाची यशाकडे घोडदौड

अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी साधला संवाद   Mumbai : प्रदेशाध्यक्ष

Nashik News: मुसळधार पावसाचा फटका, मेन रोडवरील धोकादायक वाडा कोसळला

Nashik News : नाशिक शहरात मंगळवारी तसेच बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी (दि. 1) मेन रोड परिसरातील धुमाळ पॉईंट