Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे. गावपातळीवरील जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षण, आरोग्यसेवा, शेती यासह स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिलं जात आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१८-१९, सन २०१९-२०, सन २०२०-२१, सन २०२१-२२, सन २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा आणि विशेष पुरस्कार देण्यात आला. राज्यातील सहा ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात येणार आहे.



कोकणातील ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक


संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१८-१९ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत हुमरस, ता. कुडाळ यांनी प्रथम क्रमांक तर ग्रामपंचायत आयनोडे हेवाळे ता. दोडामार्ग यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१९-२० अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत बापर्डे तालुका देवगड प्रथम तर ग्रामपंचायत परुळेबाजार वेंगुर्ला यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे.


या सहा ग्रामपंचायतीचा सन्मान २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता सिडको कार्यालय सभागृह, सिडको भवन, बेलापुर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीचा सन्मान होणार आहे. अशी माहिती (पाणी व स्वच्छता) विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य सावंत यांनी दिली आहे.


सन २०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत निरवडे ता. सावंतवाडी यांनी प्रथम क्रमांक तर ग्रामपंचायत परुळेबाजार ता. वेंगुर्ला यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. पुरस्कार विजेत्या सर्व ग्रामपंचायतीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता सिडको कार्यालय सभागृह, सातवा मजला, सिडको भवन, बेलापुर, नवी मुंबई विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

KERALA : मान्सून केरळच्या उंबरठ्यावर

पुढील २४ ते ४८ तासांत धडकणार, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट' पुणे : कडाक्याच्या उन्हाने हैराण

Cabinet Decision: शेतकरी कर्जमाफीचे निकष जाहीर

दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ; ‘वन टाईम सेटलमेंट’ आणि प्रोत्साहनपर अनुदान देणार मुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांना

Cabinet decision : ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधांना बूस्टर

 'मुख्यमंत्री ग्राम सडक योजने'साठी ६ हजार ४२९ कोटी; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : राज्यातील ग्रामीण संपर्क

Minister Adv. Ashish Shelar : रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार

मुंबई,  : रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास

Monsoon 2026 : दिलासादायक! येत्या ४८ तासांत केरळमध्ये पाऊस बरसणार; महाराष्ट्रासह 'या' राज्यांना पाऊस झोडपणार! IMD चा अंदाज काय ?

मुंबई : उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली

अमृता फडणवीसांनी चालवली गुलाबी ई-रिक्षा; महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात

मुंबई  : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक