'रो-रो'च्या माध्यमातून महत्त्वाचे जिल्हे आणि राज्ये मुंबईशी जोडणार - मंत्री नितेश राणे यांची माहिती

जलमार्गांचे जाळे उभारण्याची मुख्यमंत्र्यांची संकल्पना सत्यात उतरवणार


मुंबई : "शिमग्याच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा रो-रो सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात रो-रोच्या माध्यमातून मुंबईला अन्य जिल्हे आणि राज्यांसोबत जोडून पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न राहील", अशी माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.


विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "महाराष्ट्रात जलवाहतूक सुरु करावी, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. २०१४ ते २०१९ मध्ये त्यांच्याकडे बंदरे खाते असताना त्यांनी काही प्रकल्पांना चालना देत, नव्या संकल्पना मांडल्या होत्या. मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणे ही त्यांचीच संकल्पना आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली या संकल्पना सत्यात उतरवण्याची सुरुवात आम्ही केली आहे."


"येत्या १ मार्च पासून मुंबई आणि कोकणाला जलमार्गाने जोडण्याचा पहिला टप्पा सुरू करीत आहोत. मुंबई ते विजयदुर्ग असा हा पहिला मार्ग असेल. येत्या काळात मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड असे असंख्य मार्ग वाढवणार आहोत. मुंबई ते विजयदुर्ग या बोटीबाबतची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध असून, तिकीटची बुकिंगसुद्धा सुरू झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परवानगी मिळाल्यावर चाचणी केल्यानंतरच रो-रो सेवा सुरू करीत आहोत. प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत १ मार्चपासून बोटीवर डॉक्टरांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे", अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.



महापालिकेत विकासासाठी गेले की, धर्म वाढवण्यासाठी?


मालेगाव महापालिकेत नमाज पठण करतानाच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "निवडणुकीआधी असे लोक 'जय मीम, जय भीम' बोलतात पण निवडणुकीनंतर फक्त 'जय मीम'च राहते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते विसरतात. संविधानाच्या कुठल्या पानावर नगरपालिका किंवा महानगरपालिकेत नमाज पठणास परवानगी आहे? तुम्ही तिथे विकास करण्यासाठी निवडून गेलात की, धर्म वाढवण्यासाठी? हा जिहाद नाही का? नमाज पठण करण्यासाठी मशिदी बंद पडल्यात का? आम्ही उद्या आमच्या हिंदू राष्ट्रात प्रत्येक महापालिकेत भागवतगीता वाचणे सुरू करतो. मग हिरव्या सापांनी तोंड उघडू नये", असा इशाराही त्यांनी दिला.



मदरसे म्हणजे आतंकवादी घडवण्याचे अड्डे


"मदरसे हवेत कशाला? हे मदरसे म्हणजे आतंकवाद्यांचे अड्डे आहेत. ते आतंकवादी घडवतात. आम्ही कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये अशा शाळा उघडून भगवतगीता शिकवणे सुरु केले? इस्लामिक राष्ट्रांमध्ये त्याची परवानगी आहे का? मग आम्ही कशाला यांचे लाड करायचे? कुराण शिकवण्यासाठी तुमच्या मशिदी आहेत, मग मदरसे कशाला हवेत? महाराष्ट्रातील सगळे मदरसे बंद करा, याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे," असेही मंत्री राणे यांनी सांगितले.



लवकरच ताकदीचा लव्ह जिहादविरोधी कायदा आणणार


"केरला स्टोरी-२ या चित्रपटात सत्य दाखवण्यात आले आहे. लव्ह जिहादच्या नावाने ज्याप्रकारे हिंदू माता-भगिनींचे आयुष्य उद्धवस्थ करण्याचा प्रयत्न हे जिहादी करतात, ते सत्य यात दाखवले आहे. मी स्वत: असंख्य पीडित कुटुंबियांना भेटलो आहे. त्यामुळे जोपर्यंत जिहाद संपत नाही आणि लव्ह जिहाद थांबत नाही तोपर्यंत केरला स्टोरी १, २, ३, ४, ५ असे चित्रपट येत राहणार. अशा चित्रपटांना विरोध करण्यापेक्षा जिहाद करणे थांबवा. ज्या देशात राहता त्या देशाचा सन्मान करणे शिका. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये ताकदीचा लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा आहे तसाच ताकदीचा आणि हिंदु बहिणींना संरक्षण देणारा कायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणणार आहे," असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप येथील मल जल शुध्दीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होवून येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर

Ind vs Afg : भारताने अफगाणिस्तान विरूद्धची वन डे सीरिज २-० अशी जिंकली, दुसऱ्या मॅचमध्ये मोठ्या फरकाने बाजी मारली

लखनऊ : भारताने अफगाणिस्तान विरूद्धची वन डे सीरिज २-० अशी जिंकली. पहिली वन डे सात विकेट्स राखून आणि दुसरी वन डे १७०

Cricket : टीम इंडिया 'ए' ची फायनलमध्ये धडक; अफगाणिस्तानचा १०१ धावांनी धुव्वा

दांबुला : प्रियांश आर्या, तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर आणि निशांत सिंधूच्या

Vidhan Parishad : राज्याच्या विधानपरिषदेतील ११ जागांसाठी गुरुवारी मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील उर्वरित अकरा जागांसाठी गुरुवारी मतदान

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या