अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केले आहे. मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याची किंमत ₹३,७१६ कोटी आहे, अशी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पाली हिल परिसरात हे भव्य ६६ मीटर उंच आणि १७ मजली आहे. त्यांच्या समूह कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशन्सशी (आरकॉम) संबंधित बँक फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात बहुमजली घर जप्त करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे. अंबानी दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी येथील तपास संस्थेसमोर हजर राहण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी ईडीसमोर पहिल्यांदा साक्ष दिली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. नवीन आदेशामुळे या प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य अंदाजे १५,७०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

अनिल अंबानींसाठी हा एक मोठा धक्का आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते व्यवसायात अडचणीत आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी त्यांच्या आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बँक खात्यांना "फसवे" म्हणून वर्गीकृत करण्याच्या कार्यवाहीला स्थगिती देणारा एकल न्यायाधीशांचा अंतरिम आदेश रद्द केला. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखर यांच्या खंडपीठाने डिसेंबर २०२५ मध्ये दिलेल्या एकल खंडपीठाच्या अंतरिम आदेशाविरुद्ध तीन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि अकाउंटिंग कन्सल्टन्सी फर्म बीडीओ इंडिया एलएलपी यांनी दाखल केलेल्या अपीलांना परवानगी देताना हा निर्णय दिला.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात