Pune: पुण्यातील 'या' वाहतूक मार्गात बदल; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

पुणे: पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे मौजे रामलिंग रोड, शिरुर येथे आयोजन करण्यात आलं असून २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिरुर ते पाबळ रोडवरील (राज्य महामार्ग क्र.५४) वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.


या आदेशानुसार हा कार्यक्रम मौजे रामलिंग, ता. शिरुर येथे होत असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या भक्तगणाच्या सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने वाहतूक वळविण्यात येणार आहे. भक्तगणांना आपली वाहनं वाहनतळ ठिकाणी पार्क करुन कार्यक्रम स्थळी पायी जाता येणार आहे.



वाहतूक मार्गात बदल...


पाबळ रोड, शिरुररोडवरुन रामलिंगकडे जाणारी वाहतूक अग्निशामक केंद्र चौक, शिरुर येथून नवीन नगरपालिका रोड-जुना अहिल्यानगर पुणे हायवे रोड-बरला आर्टस शेजारील बगाड रोड ते बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग या मार्गे रामलिंगकडे जातील.


मौजे रामलिंगकडून शिरुरकडे जाणारी वाहतूक बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग बगाड रोड ते बरला आर्टस शेजारुन जुना पुणे अहिल्यानगर हायवे रोडला मिळून शिरुरमध्ये जाईल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केलं आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी