Parth Pawar : राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार राज्यसभेवर; कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय

- २६ फेब्रुवारीला सुनेत्रा पवार स्वीकारणार राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्रे


मुंबई : महाराष्ट्रातून निवृत्त होणाऱ्या राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ अजित पवार यांना संधी दिली जाणार आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे.


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक देवगिरी निवासस्थानी पार पडली. या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.


दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद रिक्त झाले आहे. या जागी अन्य कोणत्याही नेत्याऐवजी अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करावी, अशी बहुतांश आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची भावना आहे. ही भावना लक्षात घेऊन येत्या २६ फेब्रुवारी रोजी त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड केली जाणार आहे.


२६ फेब्रुवारीला कोअर कमिटीची बैठक :


येत्या २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. वरळी येथील एनएससीआय डोम सभागृहात ही बैठक होईल. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड केली जाणार आहे.


राज्यसभेचे गणित असे...

- राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचे गणित पाहता महाविकास आघाडीची मोठी अडचण होणार आहे. विधानसभेत सध्या भाजपाकडे १३१, शिवसेनेकडे ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) ४० असे महायुतीचे भक्कम बलाबल आहे. याउलट, उबाठा गटाकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि शरद पवार गटाकडे केवळ १० आमदार उरले आहेत.


- या आकडेवारीनुसार, महायुती सातपैकी किमान सहा जागा सहज जिंकू शकते. उरलेल्या एका जागेसाठी महाविकास आघाडीला आपल्या तिन्ही घटक पक्षांच्या मतांची एकजूट करावी लागेल. काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट एकत्र आले तरच एका उमेदवाराचा विजय निश्चित होऊ शकतो.


- येत्या २ एप्रिल रोजी निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये शरद पवारांसह त्यांच्या पक्षाच्या फौजिया खान, रजनी पाटील (काँग्रेस) आणि प्रियांका चतुर्वेदी (उबाठा), धैर्यशील पाटील (भाजप), डॉ. भागवत कराड (भाजप) आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे.


पार्थ पवारांना हवी सहा वर्षांची टर्म :


सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे राज्यसभेची आणखी एक जागा रिक्त होणार आहे. सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेतील कार्यकाळ जुलै २०२८ पर्यंत होता. त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवायचे की सहा वर्षांच्या पूर्ण मुदतीच्या जागेवर त्यांची निवड करायची, यावर पक्षात खल सुरू होता. मात्र, पार्थ पवार हे पूर्ण सहा वर्षांच्या खासदारकीसाठी आग्रही असल्याने त्यांना विद्यमान निवडणुकीतून राज्यसभेवर पाठवले जाणार आहे.

Comments
Add Comment

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह