Tahawwur Rana : कुख्यात दहशतवादी तहव्वुर राणाचे कॅनडियन नागरिकत्व रद्द होणार

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्यापूर्वी कॅनडियन सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कॅनडियन सरकारने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य आरोपी तहव्वुर हुसेन राणा याच्याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कॅनडातील मीडिया अहवालानुसार, कॅनडा सरकारने राणाची कॅनडियन नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


अहवालानुसार, कॅनडाच्या ‘इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा’ (आयआरसीसी) या विभागाने राणाला त्याचे कॅनडियन नागरिकत्व रद्द करण्याचा मानस असल्याची औपचारिक सूचना दिली आहे. मात्र ही कारवाई थेट दहशतवादाच्या आरोपांशी संबंधित नसून, नागरिकत्वासाठी अर्ज करताना दिलेल्या कथित चुकीच्या माहितीसंबंधी आहे.


राणा १९९७ मध्ये कॅनडात गेला आणि २००१ मध्ये त्याला कॅनडियन नागरिकत्व मिळाले. आयआरसीसीनुसार, ३१ मे २०२४ रोजी पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले की, राणाने नागरिकत्वासाठी अर्ज करताना कॅनडातील वास्तव्यासंदर्भात चुकीची माहिती दिली होती. २००० साली अर्ज करताना त्याने चार वर्षे ओटावा आणि टोरोंटो येथे वास्तव्य केल्याचा दावा केला होता. त्या काळात फक्त सहा दिवस अनुपस्थित राहिल्याचे त्याने नमूद केले होते.


मात्र ‘रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस’ (आरसीएमपी) यांच्या तपासात तो बहुतेक काळ अमेरिकेतील शिकागो येथे असल्याचे उघड झाले. तेथे त्याच्या अनेक मालमत्ता होत्या आणि तो इमिग्रेशन सल्लागार सेवा तसेच इतर व्यवसाय चालवत होता. हे प्रकरण सध्या कॅनडाच्या ‘फेडरल कोर्ट’मध्ये प्रलंबित आहे. इमिग्रेशन विभागाच्या प्रवक्त्यानुसार, चुकीची माहिती देऊन मिळवलेले नागरिकत्व रद्द करणे ही सरकारच्या प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी आवश्यक कारवाई आहे.


पाकिस्तानी मूळ असलेल्या ६५ वर्षीय तहव्वुर हुसेन राणा सध्या भारतातील कारागृहात असून, २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यांमध्ये मदत केल्याच्या आरोपांवर त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. राणावर डेविड कोलमन हेडली आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा तसेच हरकत-उल-जिहादी इस्लामीशी संबंधित दहशतवाद्यांसोबत मिळून २००८ च्या मुंबई हल्ल्यांची कटकारस्थान रचल्याचा आरोप आहे. २६/११ च्या हल्ल्यांत अधिकृत आकडेवारीनुसार १६६ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो जखमी झाले होते.


अमेरिकेत अटकेनंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. प्रत्यार्पण थांबवण्यासाठी राणाने अमेरिकन न्यायालयांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली, मात्र त्याच्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या. एप्रिल २०२५ मध्ये त्याला भारतात आणण्यात आले आणि ‘राष्ट्रीय तपास यंत्रणा’ (एनआयए) ने त्याला अटक केली. मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उचललेले हे पाऊल भारत-कॅनडा संबंधांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Pakistan : पाकिस्तानने सीमेवर तैनात केल्या चिनी तोफा, भारत सावध; राष्ट्रहितासाठी योग्य ती कारवाई करू, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताशी खेटून असलेल्या सीमेवर चिनी तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. काही

Foreign Journalists in Pakistan : POK मधील सत्य लपवण्याचा प्रयत्न? पाकिस्तानने परदेशी पत्रकारांसाठी लागू केले नवे नियम

इस्लामाबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) मधील आंदोलनांवर करण्यात आलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरावर

Dubai Explosion : दुबई हादरली! जेबेल अली अन् पाम जुमेराहजवळ भीषण स्फोट? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

दुबईच्या जेबेल अली औद्योगिक परिसरात बुधवारी पहाटे स्फोट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात

Yemen attack : येमेनजवळ भारतीय मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 13 भारतीयांसह सर्व 14 खलाशी सुखरूप

येमेनच्या पश्चिम किनाऱ्याजवळ लाल समुद्रात भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र

Abbas Araghchi : परराष्ट्र मंत्री अराघची यांना हटवण्याची तयारी, इराणमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र

तेहरान : इराणच्या सत्ताकेंद्रात मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. काही खासदारांनी परराष्ट्र