लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात

मुंबई: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जानेवारी महिन्याचा निधी वितरणाची प्रक्रिया मंगळवारपासून अधिकृतपणे सुरू झाली असून, लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे ही महत्त्वाची माहिती दिली.





२३ फेब्रुवारीपासून निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात सन्मान निधी जमा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यशस्वीपणे सुरू असल्याचे तटकरे यांनी नमूद केले.


महायुती सरकारचा दृढ निश्चय आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा विश्वास या बळावर या योजनेची दमदार वाटचाल अशीच सुरू राहणार," असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र