गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात आली मोठी अपडेट

मुंबई : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे हिने वरळीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पती अनंत गर्जेचे अन्य महिलेसोबतचे संबंध असल्याचे कळल्याने आलेल्या नैराश्यातून गौरीने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी समजले होते. पण गौरीच्या कुटुंबियांनी गर्जे कुटुंबाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. गौरीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या छळाला वैतागून गौरीने गळफास घेतल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. कायद्यातील तरतुदीनुसार पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी आरोप आणि संशयाआधारे पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली होती. आता तब्बल तीन महिन्यांनंतर अनंत गर्जेला जामीन मिळाला आहे.


डॉ. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी अनंत गर्जेला मुंबईच्या सत्र न्यायालयाने जामीन दिला. यामुळे तब्बल तीन महिन्यांनी अनंत गर्जे तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.


गौरीने २२ नोव्हेंबर २०२५ रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पती अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक करत चौकशी केली होती. गौरी गर्जेने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप गौरीच्या पालकांनी केला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.


अनंत गर्जे आणि डॉ. गौरी पालवे यांचा विवाह फेब्रुवारी २०२५ मध्ये झाला होता. दोघांचेही मूळ गाव एकच होते. पण मागील काही वर्षांपासून ते दोघेही मुंबईत स्थायिक होते. गौरी गर्जे या केईएम रुग्णालयातील दंत विभागात डॉक्टर होत्या. तर अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे पीए म्हणून काम करत होते. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सुरळीत सुरू होते. पण लवकरच गर्जे दांपत्यात वाद सुरू झाले. यातून परिस्थिती बिकट झाली आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये गौरीने जीवन संपवले. या प्रकरणात कौटुंबिक हिंसाचार, पतीचे अनैतिक संबंध आदी मुद्यांच्याआधारे तपास करून पोलिसांनी संशयावरून आरोपी म्हणून अनंत गर्जेला अटक केली होती.

Comments
Add Comment

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Ford Employees : नारळ दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच पुन्हा बोलावण्याची फोर्डवर वेळ, एआयचा प्रयोग ठरला अपुरा

नवी दिल्ली : विविध उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असून अनेक कंपन्या

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला