महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रथमच संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे स्वर

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रथमच संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे स्वर घुमले. सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी ६ कडव्यांचे आणि ३ मिनिटे १० सेकंदांचे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. ‘वन्दे मातरम्’ गीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत म्हटले गेले. राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वीही प्रथम ‘वन्दे मातरम्’, त्यानंतर ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.


‘वन्दे मातरम्’ गीताचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेऊन या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रशासनाने सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केले आहे. यासह ‘जन-गण-मन’ पूर्वी ‘वन्दे मातरम्’ गीत म्हणण्याचा नवीन नियम लागू केला आहे, तसेच ‘वन्दे मातरम्’ गीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रथमच या नियमाची कार्यवाही झाली आहे.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य