महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रथमच संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे स्वर

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रथमच संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे स्वर घुमले. सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी ६ कडव्यांचे आणि ३ मिनिटे १० सेकंदांचे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. ‘वन्दे मातरम्’ गीतानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत म्हटले गेले. राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वीही प्रथम ‘वन्दे मातरम्’, त्यानंतर ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.


‘वन्दे मातरम्’ गीताचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेऊन या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रशासनाने सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केले आहे. यासह ‘जन-गण-मन’ पूर्वी ‘वन्दे मातरम्’ गीत म्हणण्याचा नवीन नियम लागू केला आहे, तसेच ‘वन्दे मातरम्’ गीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रथमच या नियमाची कार्यवाही झाली आहे.

Comments
Add Comment

टीएमएस २ .०  मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीएमएस २ .०  (ट्रांन्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणालीचा आज शुभारंभ मुंबई : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य

बदलापूर बीजांड विक्री रॅकेट प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल

महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या माफियांना पायबंद घाला; IVF-सरोगसी प्रक्रियेवर कडक नियंत्रणाची मागणी- डॉ.

खंडाळा घाटात पुन्हा थरार! ज्वलनशील गॅस टँकर घसरला; काही काळ वाहतूक ठप्प

मुंबई : मागील महिन्यात मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर एका टँकरचा अपघात झाला होता, त्यातील ज्वलनशील प्रोपेलिन गॅसची

Aditi Tatkare : दादा एकटे गेले नाहीत, आमचा रुबाब आणि माजही सोबत घेऊन गेले!" मंत्री आदिती तटकरेंचा विधीमंडळात अश्रूंचा बांध फुटला

मुंबई : अजितदादांच्या निधनाला महिना उलटला असला तरी, त्यांच्या आठवणींनी आजही त्यांचे सहकारी भावूक होत आहेत. महिला

जलसिंचनाच्या क्षेत्रात राज्यात वर्षभरात झालेल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध

मुंबई : जलसिंचनामध्‍ये राज्‍याला समृध्‍द करण्‍याच्‍या दृष्‍टीने महायुती सरकारने मागील एक वर्षाच्‍या

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल धोरणांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल

·कृषी एआयमध्ये गुंतवणूक : गुंतवणूक बाजारपेठ व नवकल्पना या विषयावर आयोजित परिसंवादात तज्ज्ञांचे मत मुंबई :