भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक लोकांकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी होताना दिसते, आणि त्यावर कायमचा तोडगा महापालिका शोधताना दिसतही आहे. पण ही संख्या दिवसेंदिवस इतकी वाढत जाते आहे की याला आता आवरण मुश्किल झालय. या भटक्या कुत्रांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी होतात तर काहींना आपला जीव गमवावा लागतो. ही दहशत इतकी वाढली आहे की लोकांच्या मनात याची भीती बसली आहे. आणि याच भीतीपोटी एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.


कल्याण पूर्वेतील सहजीवन सोसायटीमधील एक आयाश आमीन या तरुणाच्या पायाला काही दिवसांपूर्वीच भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर त्याने रेबीजचे इंजेक्शनही घेतले होते. परंतु याच कुत्र्याच्या चाव्याच्या भीतीने तो चिंतेत होता. घरातला कमावता मुलगा असल्याने मला रेबीज झाला तर घरच्यांचं कस होणार ही भीती त्याला सतावत होती. या भीतीमध्येच रेबीजची लक्षणे आपल्यात दिसू लागली आहेत असा भास त्याला व्हायचा.


यामुळे खचून त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने त्याच्या भीतीची कारणे लिहिली होती. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी केडीएमसी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेतली आहे. भटक्या कुत्र्यासंदर्भात त्वरित उपाययोजना करण्यात यावी ही मागणी त्यांनी केली आहे. मात्र या तरूणाच्या टोकाच्या पावलामुळे सर्वांनाच हादरा बसला आहे

Comments
Add Comment

दुबई विमानतळावर इराणचा हवाई हल्ला, सर्व उड्डाणं रद्द

दुबई : पश्चिम आशियात २८ फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धाने आता १७

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या; अखेर थरारक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून केल्याची

Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय

BCCI Naman Awards 2026: गिल-मानधना यांचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मान; बिन्नी, द्रविड आणि मिताली यांचाही सन्मान

नवी दिल्ली: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना २०२४-२०२५ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी रविवारी

२१ वर्षीय जैन भिक्षूचा मृत्यू; १५ व्या वर्षी दीक्षा, सहा वर्षात मृत्यू

पालघर: सहकाऱ्यांसोबत पायी तीर्थयात्रेवर निघालेल्या २१ वर्षीय जैन भिक्षू यांच्या मृत्यूने जैन समाजात शोककळा

चीनमधील तरुण-तरुणी AI पार्टनर गेल्याच्या दुखात, Cyber ​​Widowhood आहे तरी काय?

नवी दिल्ली: चीनमधील एक संकल्पना सध्या जगभराचं लक्ष वेधून घेत आहे. या संकल्पनेचं नाव आहे Cyber Widowhood. म्हणजेच सायबर