जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन दहशतवादी ठार, दहशतवाद्यांचा तळ केला उद्ध्वस्त

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये चतरू भागात सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. सुरक्षा पथकाने दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला तसेच 'जैश - ए - मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. आणखी काही दहशतवादी परिसरात लपले असल्यामुळे चकमक अद्याप सुरू आहे.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना 'जैश - ए - मोहम्मद'चे किमान दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने सुरक्षा यंत्रणेला दिली. ही माहिती मिळताच सुरक्षा पथकाने किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली. सुरक्षा पथकाने चतरू भागात शोध मोहीम हाती घेतली. जवान थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचणार याची जाणीव होताच दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा पथकाने प्रत्युत्तर दिले. चकमकीत 'जैश - ए - मोहम्मद'चे दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा पथकाने चतरूमधील दहशतवाद्यांचा एक तळ उद्ध्वस्त केला. लपलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

याआधी ४ फेब्रुवारी रोजी सुरक्षा दलांनी चतरू येथे जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला ठार मारले होते. तसेच उधमपूर जिल्ह्यात, एका गुहेत लपलेले जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ग्रेनेड स्फोटात मारले गेले.
Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला