लाचखोरी प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल - नरहरी झिरवाळ

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागात परवान्यांच्या नूतनीकरणासाठी सुरू असलेल्या लाचखोरीच्या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या गंभीर प्रकारावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, "हा प्रकार अत्यंत गलिच्छ असून या प्रकरणातील सत्य लवकरच चौकशीतून बाहेर येईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


औषध विक्रेत्यांच्या परवान्यांमध्ये त्रुटी आढळल्यास एफडीएचे इन्स्पेक्टर दुकानदारांचा परवाना निलंबित करतात. या निलंबनाविरुद्ध मंत्र्यांकडे दाद मागण्याची कायदेशीर तरतूद आहे. मात्र, या प्रक्रियेत मंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे खासगी सचिव (पीए) रामदास गाडे आणि लिपिक डेरिंगे हे स्वतः अपील ऐकत असल्याचे व परवाना पूर्ववत करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करत असल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले.


यावर भाष्य करताना झिरवळ म्हणाले की, "ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले, त्यांनी ते शत्रू म्हणून केले नसून कामात होणाऱ्या त्रासामुळे सत्य बाहेर आणले आहे. अशा घटनांमुळे मानसिक त्रास होतो, मात्र आता सखोल चौकशी सुरू असून 'दूध का दूध आणि पानी का पानी' होईल."


कर्मचाऱ्यांना दिली तंबी


झिरवळ म्हणाले, "राज्याच्या गरजेचा माणूस गेला याचे दुःख असताना, माझ्या दालनात असा प्रकार घडणे अत्यंत चुकीचे आहे. मी माझ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट तंबी दिली आहे की, पारदर्शक पद्धतीने काम करा. कुठेही प्रशासनाला कलंक लागेल असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही". दरम्यान, सुनेत्रा वहिनींना दादांच्या (अजित पवार) जागी योग्य स्थान मिळावे, ही सर्वांचीच भावना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा