लाचखोरी प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल - नरहरी झिरवाळ

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागात परवान्यांच्या नूतनीकरणासाठी सुरू असलेल्या लाचखोरीच्या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या गंभीर प्रकारावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, "हा प्रकार अत्यंत गलिच्छ असून या प्रकरणातील सत्य लवकरच चौकशीतून बाहेर येईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


औषध विक्रेत्यांच्या परवान्यांमध्ये त्रुटी आढळल्यास एफडीएचे इन्स्पेक्टर दुकानदारांचा परवाना निलंबित करतात. या निलंबनाविरुद्ध मंत्र्यांकडे दाद मागण्याची कायदेशीर तरतूद आहे. मात्र, या प्रक्रियेत मंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे खासगी सचिव (पीए) रामदास गाडे आणि लिपिक डेरिंगे हे स्वतः अपील ऐकत असल्याचे व परवाना पूर्ववत करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करत असल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले.


यावर भाष्य करताना झिरवळ म्हणाले की, "ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले, त्यांनी ते शत्रू म्हणून केले नसून कामात होणाऱ्या त्रासामुळे सत्य बाहेर आणले आहे. अशा घटनांमुळे मानसिक त्रास होतो, मात्र आता सखोल चौकशी सुरू असून 'दूध का दूध आणि पानी का पानी' होईल."


कर्मचाऱ्यांना दिली तंबी


झिरवळ म्हणाले, "राज्याच्या गरजेचा माणूस गेला याचे दुःख असताना, माझ्या दालनात असा प्रकार घडणे अत्यंत चुकीचे आहे. मी माझ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट तंबी दिली आहे की, पारदर्शक पद्धतीने काम करा. कुठेही प्रशासनाला कलंक लागेल असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही". दरम्यान, सुनेत्रा वहिनींना दादांच्या (अजित पवार) जागी योग्य स्थान मिळावे, ही सर्वांचीच भावना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने

Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलनं चिघळलं, बॉम्बहल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, इंटरनेट बंदीसह संचारबंदी लागू

मणिपूर येथे पुन्हा एकदा आंदोलन झालं आहे. सोमवारी मध्यरात्री विष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या

Ashwini Bhide : रस्ते सिमेंटीकरण कामांना कोणतीही मुदतवाढ नाही

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या

BMC News : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्ती खर्चात ७५ टक्के घट

तब्बल २०२ कोटींवरुन खर्च आता अंदाजे ४४ कोटींवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या

Iran US War Ceasefire : १० कलमी अटी अन् बरंच काही...; 'इराणला उद्ध्वस्त करू' म्हणणारे ट्रम्प अचानक मवाळ का झाले ? नेमकी कोणाची खेळी ?

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये (Iran US War Ceasefire) अखेर दोन

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न