२१ फेब्रुवारीलाच का साजरा करतात जागतिक मातृभाषा दिन? जाणून घ्या इतिहास

मुंबई : भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा केला जातो. बहुभाषावादाला प्रोत्साहन देणे आणि लोप पावत चाललेल्या भाषांबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसामागील प्रमुख हेतू आहे.


हा दिवस प्रथम १९९९ साली UNESCO च्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. त्यानंतर २००२ मध्ये युनाइटेड नेशनच्या आमसभेने अधिकृत मान्यता दिली. तेव्हापासून २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.



भाषिक विविधतेचे महत्त्व


जगभरात सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात. भारतात संविधानमान्य २२ भाषा असून, विविध बोलीभाषांसह सुमारे १३०० हून अधिक मातृभाषा अस्तित्वात आहेत. जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि स्थलांतर यामुळे अनेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर मातृभाषेचे जतन, प्रसार आणि शिक्षणात मातृभाषेचा वापर वाढवणे यावर भर देण्यासाठी विविध देशांमध्ये कार्यक्रम, परिसंवाद आणि जनजागृती उपक्रम आयोजित केले जातात.



२१ फेब्रुवारीच का?


१९५२ साली तत्कालीन पाकिस्तानमध्ये उर्दूला अधिकृत भाषा घोषित करण्याच्या निर्णयाविरोधात ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बंगाली भाषेलाही अधिकृत मान्यता देण्यात आली. भाषिक हक्कांसाठी दिलेल्या या बलिदानाच्या स्मरणार्थ २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.


जागतिक मातृभाषा दिन हा केवळ एक औपचारिक दिन नसून, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचा आणि तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्याचा दिवस मानला जातो.

Comments
Add Comment

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Ritu Tawde : मिठी नदीतील गॅस साठा म्हणजे 'भ्रष्टाचाराचा कचरा'; रितू तावडे यांचा 'पेंग्विन सेने'वर घणाघाती प्रहार!

मुंबई : भाजप नेत्या आणि महापौर रितू तावडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक आक्रमक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे

गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारची नियमावली

अत्यावश्यक सेवांना प्राधान्य; साठा मुबलक, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुंबई : इराण आणि इस्राईल दरम्यान

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

मुंबई : मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय

१ एप्रिलपासून मर्सिडीज-बेंझच्या कार किमतीत २ टक्क्यांची होणार वाढ

मुंबई : जर्मनीची प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतीय बाजारातील ग्राहकांसाठी एक